शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

टिकुजिनीवाडी ते बोरिवली बोगद्याचा प्रवास रखडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 01:54 IST

ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली

अजित मांडके,  ठाणेठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली असली तरी आता हा पर्याय सुरु होण्यापूर्वीच रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरीत लवादाने संजय गांधी नॅशनल पार्क परिसरापासून १० किमीपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिल्याने त्याचा परिणाम या पर्यायी मार्गावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सहा पदरी टनेलसाठी सुमारे ४ हजार कोंटीचा खर्च केला जाणार असून, हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाली असून आता पुढील मंजुरीसाठी वनविभाग, पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला आणि वन्यजीव मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण टनेल वनविभागाच्या जागेतून जाणार असल्याने हा सुरक्षित मार्ग मानला जात होता. परंतु आता राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे हा मार्ग कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाबाबत ठाण्यात सध्यातरी संभ्रमाचे वातावरण असून हे अंतर १०० मीटर का १० किमी याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. परंतु १० किमी असले तरी किंवा १०० मीटर असले तरी देखील या दोन्ही मुद्यांवरुन या महत्त्वाच्या प्रकल्पात मात्र अडथळेच निर्माण होणार आहेत. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सध्या या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळाली आहे, त्याचे अद्याप डिझाइन तयार नाही. तसेच वन विभागासह विविध माध्यमांच्या परवानग्यादेखील घेणे शिल्लक आहे.राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार बोरीवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात १० किमी पर्यंत बांधकामांना बंदी घातल्याची वृत्त धडकताच शहरात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ठाण्यात मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार असा कोणताही नवा आदेश सध्या प्राप्त त्यांना झाला नाही. मात्र, जुलैमध्ये आलेल्या आदेशानुसार १०० मीटर परिसराच्या आत कोणतेही बांधकाम करता येऊ शकणार नाही. परंतु १० किमी पर्यंतचे आदेश सध्या तरी प्राप्त झालेले नाहीत. १० किमीपर्यंत आदेशात वाईल्ड लाईफची परवानी घेण्याचे बंधन असू शकते, असाही कयास प्रशासनाने लावला आहे.