शहरं
Join us  
Trending Stories
1
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
2
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
3
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
4
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
5
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
6
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
7
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
8
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
9
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
10
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
11
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
12
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
13
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
14
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
15
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
16
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
17
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
18
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
19
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
20
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...

टिकुजिनीवाडी ते बोरिवली बोगद्याचा प्रवास रखडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 01:54 IST

ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली

अजित मांडके,  ठाणेठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली असली तरी आता हा पर्याय सुरु होण्यापूर्वीच रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरीत लवादाने संजय गांधी नॅशनल पार्क परिसरापासून १० किमीपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिल्याने त्याचा परिणाम या पर्यायी मार्गावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सहा पदरी टनेलसाठी सुमारे ४ हजार कोंटीचा खर्च केला जाणार असून, हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाली असून आता पुढील मंजुरीसाठी वनविभाग, पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला आणि वन्यजीव मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण टनेल वनविभागाच्या जागेतून जाणार असल्याने हा सुरक्षित मार्ग मानला जात होता. परंतु आता राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे हा मार्ग कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाबाबत ठाण्यात सध्यातरी संभ्रमाचे वातावरण असून हे अंतर १०० मीटर का १० किमी याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. परंतु १० किमी असले तरी किंवा १०० मीटर असले तरी देखील या दोन्ही मुद्यांवरुन या महत्त्वाच्या प्रकल्पात मात्र अडथळेच निर्माण होणार आहेत. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सध्या या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळाली आहे, त्याचे अद्याप डिझाइन तयार नाही. तसेच वन विभागासह विविध माध्यमांच्या परवानग्यादेखील घेणे शिल्लक आहे.राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार बोरीवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात १० किमी पर्यंत बांधकामांना बंदी घातल्याची वृत्त धडकताच शहरात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ठाण्यात मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार असा कोणताही नवा आदेश सध्या प्राप्त त्यांना झाला नाही. मात्र, जुलैमध्ये आलेल्या आदेशानुसार १०० मीटर परिसराच्या आत कोणतेही बांधकाम करता येऊ शकणार नाही. परंतु १० किमी पर्यंतचे आदेश सध्या तरी प्राप्त झालेले नाहीत. १० किमीपर्यंत आदेशात वाईल्ड लाईफची परवानी घेण्याचे बंधन असू शकते, असाही कयास प्रशासनाने लावला आहे.