शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
6
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
7
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
8
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
9
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
10
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
11
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
12
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
13
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
14
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
15
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
16
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
17
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
18
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
19
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
20
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास

टिकुजिनीवाडी ते बोरिवली बोगद्याचा प्रवास रखडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2015 01:54 IST

ठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली

अजित मांडके,  ठाणेठाणे ते बोरिवली या दमछाक करणाऱ्या प्रवासाला पर्याय म्हणून टिकुजीनी वाडी ते बोरिवली या भूयारी मार्गाला रस्ते विकास महामंडळाच्या इन्फ्राट्रक्चर कमिटीने मंजुरी दिली असली तरी आता हा पर्याय सुरु होण्यापूर्वीच रखडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरीत लवादाने संजय गांधी नॅशनल पार्क परिसरापासून १० किमीपर्यंत बांधकाम करण्यास बंदी घालण्याचे आदेश दिल्याने त्याचा परिणाम या पर्यायी मार्गावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या सहा पदरी टनेलसाठी सुमारे ४ हजार कोंटीचा खर्च केला जाणार असून, हे अंतर केवळ १० मिनिटांत कापले जाणार आहे. त्याला मंजुरी मिळाली असून आता पुढील मंजुरीसाठी वनविभाग, पर्यावरण खात्याचा ना हरकत दाखला आणि वन्यजीव मंडळाची परवानगी घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण टनेल वनविभागाच्या जागेतून जाणार असल्याने हा सुरक्षित मार्ग मानला जात होता. परंतु आता राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशामुळे हा मार्ग कागदावरच राहण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाबाबत ठाण्यात सध्यातरी संभ्रमाचे वातावरण असून हे अंतर १०० मीटर का १० किमी याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. परंतु १० किमी असले तरी किंवा १०० मीटर असले तरी देखील या दोन्ही मुद्यांवरुन या महत्त्वाच्या प्रकल्पात मात्र अडथळेच निर्माण होणार आहेत. या संदर्भात एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सध्या या प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळाली आहे, त्याचे अद्याप डिझाइन तयार नाही. तसेच वन विभागासह विविध माध्यमांच्या परवानग्यादेखील घेणे शिल्लक आहे.राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार बोरीवलीतील संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात १० किमी पर्यंत बांधकामांना बंदी घातल्याची वृत्त धडकताच शहरात चलबिचल सुरू झाली आहे. त्यामुळे ठाण्यात मात्र विविध चर्चेला उधाण आले आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार असा कोणताही नवा आदेश सध्या प्राप्त त्यांना झाला नाही. मात्र, जुलैमध्ये आलेल्या आदेशानुसार १०० मीटर परिसराच्या आत कोणतेही बांधकाम करता येऊ शकणार नाही. परंतु १० किमी पर्यंतचे आदेश सध्या तरी प्राप्त झालेले नाहीत. १० किमीपर्यंत आदेशात वाईल्ड लाईफची परवानी घेण्याचे बंधन असू शकते, असाही कयास प्रशासनाने लावला आहे.