शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जेएनपीटी परिसर ठरतोय तस्करीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:34 IST

दिल्ली पोलिसांनी पकडले हेरॉइन : रक्तचंदनासह सोने तस्करीच्या प्रकारात वाढ; सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची गरज

नामदेव मोरे नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये विशेषत: जेएनपीटीजवळचा परिसर तस्करीचे केंद्रस्थान ठरू लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तब्बल १३० किलो हेरॉइन या परिसरातून जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. यापूर्वीही परिसरात रक्तचंदन व सोने तस्करीचे प्रकार निदर्शनास आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्येही अमली पदार्थांची तस्करी वाढू लागली आहे. महाविद्यालयीन तरुणही अमली पदार्थांच्या आहारी जाऊ लागले आहेत. शहरातील उद्याने, मोकळ्या इमारतीमध्ये नशा करत असलेले तरुण बसलेले दृश्य दिसू लागले आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईवरून पाहावयास मिळत होते; परंतु आता एमडी पावडर, कोकेन, हेरॉइन या अमली पदार्थांचा वापर होऊ लागला आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने या परिसरातून तब्बल १३० किलो अफगाण हेरॉइन जप्त केले असून, बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत जवळपास १३०० कोटी असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईमुळे या परिसरातील तस्करीचे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात आहे हे उघड झाले आहे. आतापर्यंत जेएनपीटीच्या परिसरामध्ये रक्तचंदन व सोने तस्करी मोठ्या प्रमाणात होऊ लागली होती. रक्तचंदनाचा मोठा साठा या परिसरातून नवी मुंबई पोलीस व सीमाशुल्क विभागानेही हस्तगत केला आहे. अनेक टोळ्या जेरबंद केल्या आहेत. एका वर्षामध्ये सोने तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोने तस्करीचे प्रकार सीमाशुल्क विभागाने व इतर तपास यंत्रणांनी उघडकीस आणले आहेत.

जेएनपीटी हे देशातील प्रमुख बंदरापैकी एक आहे. यामुळे समुद्रमार्गे तस्करीसाठी या परिसराचा वापर होत आहे. मसाल्याचे पदार्थ, भंगार व इतर वस्तूंच्या आडून अवैध व्यापार होत आहे. तस्करी रोखण्यासाठी सीमाशुल्क विभागासह इतर तपास यंत्रणा असल्या तरी नवी मुंबई पोलिसांची जबाबदारीही वाढू लागली आहे. अमली पदार्थमुक्त नवी मुंबई करण्यासाठी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथक तयार केले आहे; परंतु नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरासाठी एकच पथक आहे. त्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक व १२ कर्मचारी एवढेच मनुष्यबळ उपलब्ध आहे. आयुक्तालय क्षेत्रामध्ये होणाऱ्या कारवाईचे स्वरूप लक्षात घेता मनुष्यबळ खूपच कमी आहे. स्थानिक पोलीस स्टेशनकडून अपेक्षित कारवाई होत नाही, यामुळे उरण व पनवेलमध्येही अमली पदार्थ विरोधी स्वतंत्र पथक निर्माण करण्याची आवश्यकता आहे. गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस स्टेशनकडूनही अमली पदार्थांचे सेवन व अवैध व्यापार करणाऱ्यांवर नियमित कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

आयुक्तालय परिसरात प्रमुख तस्करीच्या घटना२०११ - जेएनपीटीजवळ सीमाशुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून दोन कोटी नऊ लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त केले.आॅगस्ट २०१३ - उरण रोडवर दोन कंटेनरवर छापा टाकून साडेआठ कोटी रुपये किमतीचे ४२ टन रक्तचंदन जप्त केले.मार्च २०१५ - मुंबई-गोवा महामार्गावर कल्ले गावाजवळ कंटेनरमध्ये ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचे रक्तचंदन जप्तडिसेंबर २०१७ - एसीच्या पार्टमधून ५० किलो सोन्यानी बिस्किटे लपवून आणली होती. सीमाशुल्क विभागाने सोने जप्त केले.मार्च २०१८ - दुबईला पाठविण्यासाठी आणलेले सात टन रक्तचंदन जप्त करण्यात आले.एप्रिल २०१९ - दुबईवरून आलेल्या भंगारामधून १९ किलो वजनाची सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली.