शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 06:06 IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : इर्शाळवाडीतील आपदग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रकल्प सिडकोने निर्धारित वेळेत पूर्ण केला आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी इर्शाळवाडीतील आपद्वस्तांना घरांचे वाटप करण्याचे सुतोवाच त्यांनी या पाहणीदरम्यान केले होते. त्यानुसार संबंधित विभाग कामाला लागला असून, दसऱ्याच्या मुहूर्तावर आपढ्रस्तांना त्यांच्या हक्काच्या घराचे वाटप केले जाईल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे २७ जुलै २०२३ रोजी दरड कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. या दुर्घटनेत वाडीतील ४४ कुटुंबे बेघर झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दरडग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करण्याचे निर्देश रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार चौक येथे २.६ हेक्टर जागेवर सिडकोने पुनर्वसन प्रकल्प उभारला आहे. 

विशेष म्हणजे आपद्वस्तांना त्यांच्या हक्काच्या घरांचे वाटप केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. मात्र, वर्ष उलटून गेले तरी घरांचे वाटप झालेले नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या शुक्रवारी या पुनर्वसन प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर आचारसंहितेपूर्वी या घरांच्या चाव्या संबंधित लाभधारकांना देण्यात येतील, अशी ग्वाही दिली आहे. त्यानुसार संबंधित विभाग कामाला लागला आहे.

२.६ हेक्टर जागेवर आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन 

चौकजवळील नानिवली गावातील २.६ हेक्टर जागेवर इर्शाळवाडी आपद्गस्तांचे पुनर्वसन केले आहे. या ठिकाणी आपदग्रस्तांसाठी ४४ पक्की घरे बांधली जात आहेत. विशेष म्हणजे आपद्वस्तांसाठी प्रत्येकी ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ४४ भूखंडांवर ४४ घरे बांधली आहेत. प्रकल्पाची ही जागा काही प्रमाणात जमिनीपासून उंचावर आहे. असे पुनर्वसन असले तरी भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी नियोजित जागेच्या सर्व बाजूस आरसीसी संरक्षक भिंत बांधण्याचे कामही पूर्णत्वास आले आहे. त्याशिवाय प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाजमंदिर, उद्यान, खेळाचे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाणी, वीज आणि रस्ते आदी सोयी-सुविधांचे कामेसुद्धा पूर्ण झाली आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईState Governmentराज्य सरकार