शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

शहरवासीयांना अनियमित पाणीपुरवठा, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 03:06 IST

शहराच्या विविध भागात सकाळपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुरेशी माहिती दिली न गेल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

नवी मुंबई : शहराच्या विविध भागात सकाळपासून अनियमित पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात पुरेशी माहिती दिली न गेल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा झाला नाही, तर काही भागात एकच वेळा आणि तोही अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा झाल्याने नागरिकांचे हाल झाले.मोरबे धरणाच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी बिघाड झाल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, तशा सूचना नागरिकांना देण्यात आल्या होत्या. दुरुस्तीच्या कालावधीत सोमवारी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही, असे सूचित करण्यात आले होते. परंतु मंगळवारी दिवसभर पाणीपुरवठा न झाल्याने रहिवाशांत तारांबळ उडाली. कोपरखैरणे, घणसोलीसह वाशी व नेरूळ परिसरातही दिवसभर अनियमित पाणीपुरवठा सुरू होता. संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्याने रहिवाशांनी पाण्यासाठी जवळच्या जलकुंभावर गर्दी केली होती. शहराला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अशात पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याने नागरिकांत नाराजीचा सूर दिसून आला. दरम्यान, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने सोमवारी त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर काही वेळाने त्यात पुन्हा बिघाड झाला. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला. असे असले तरी सध्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून बुधवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोपरखैरणे) संजय देसाई यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Waterपाणी