शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

वृक्षतोडीसह माती उत्खननाची चौकशी करा; सीबीडीतील रहिवाशांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 23:44 IST

पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ मध्ये संरक्षण भिंत बांधताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली असून येथील मातीचीही अवैधपणे वाहतूक करण्यात आली असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रहिवाशांनी केली असून याविषयी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला आहे.बेलापूरमध्ये पावसाळ्यात डोंगराचा काही भाग खचून कल्पतरू सोसायटीची संरक्षण भिंत कोसळली होती. पावसाचे पाणी व रेती इमारतीच्या आवारात शिरले होते. सदर ठिकाणी महानगरपालिकेने संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. संरक्षण भिंत बांधताना डोंगर उतारावरील अनेक वृक्ष तोडण्यात आले असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. उतारावरील माती डम्परमध्ये भरून इतर ठिकाणी नेण्यात आली आहे. माती इतर ठिकाणी घेऊन जाण्यास रहिवाशांनी विरोध केला आहे. निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबविण्यात यावा. वृक्षतोड व माती वाहतुकीची चौकशी करण्यात यावी. नियमबाह्यपणे काम झाले असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याविषयी पत्रव्यवहार सुरू केला आहे.