शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आदिवासींच्या वेदनांवर फुंकर, प्राथमिक सुविधांच्या पूर्ततेचे महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:33 IST

नवी मुंबई : पावणे आणि खैरणे येथील आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे.

नवी मुंबई : पावणे आणि खैरणे येथील आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. शहरातील मूळ रहिवासी असलेल्या या आदिवासींना आजही प्राथमिक सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत आहे. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका येथील आदिवासी कुटुंबांना बसला आहे. नवनिर्वाचित महापौर जयवंत सुतार यांनी शनिवारी या आदिवासी वसाहतींना भेट देऊन त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.पावणे येथील वारलीपाडा आदिवासी वसाहतीचे पुनर्वसन करण्यासाठी याच भागात घरकूल योजना राबविण्यात आली आहे. सध्या येथे ३५ घरे बांधून तयार आहेत. या नवीन घरांत लवकरच आदिवासींचे पुनर्वसन केले जाणार आहे; परंतु येथे प्राथमिक सुविधांचा वणवा आहे. रस्ते, दिवाबत्ती व पाण्याची सुविधा अपूर्ण आहे. अंगणवाडी तयार नाही. त्यामुळे या सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय स्थलांतरित होणार नाही, असा पवित्रा वारलीपाड्यातील आदिवासींनी घेतला आहे. यातच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या आदिवासीपाड्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला येथील आदिवासींनी हुसकावून लावले. महापालिकेच्या भूमिकेचा वारलीपाडा गाव बचाव समितीने निषेध केला आहे.तर पावणे-खैरणे येथील श्रमिकनगरमधील आदिवासींसाठी महापालिकेने वाल्मीकी-आंबेडकर आवास योजनेअंतर्गत सहा इमारती बांधल्या आहेत; परंतु यातील घरे खुराड्यांच्या आकाराची असल्याने आदिवासींनी ती नाकारली आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून वापराविना पडून असल्याने या इमारतींची पडझड झाली आहे.या पडेल इमारतीतील घरांचा ताबा घ्यावा, यासाठी महापालिकेकडून अप्रत्यक्ष दबाव आणला जात असल्याचा आदिवासींचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहराचे नवनिर्वाचित महापौर जयवंत सुतार यांनी शनिवारी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाºयांसह या आदिवासीपाड्यांना भेट देऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येथील आदिवासींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई