शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

आदिवासींच्या वेदनांवर फुंकर, प्राथमिक सुविधांच्या पूर्ततेचे महापौरांचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 01:33 IST

नवी मुंबई : पावणे आणि खैरणे येथील आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे.

नवी मुंबई : पावणे आणि खैरणे येथील आदिवासींच्या पुनर्वसनाचा प्रश्न दीर्घकाळ रखडला आहे. शहरातील मूळ रहिवासी असलेल्या या आदिवासींना आजही प्राथमिक सोयी-सुविधांसाठी झगडावे लागत आहे. प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका येथील आदिवासी कुटुंबांना बसला आहे. नवनिर्वाचित महापौर जयवंत सुतार यांनी शनिवारी या आदिवासी वसाहतींना भेट देऊन त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली.पावणे येथील वारलीपाडा आदिवासी वसाहतीचे पुनर्वसन करण्यासाठी याच भागात घरकूल योजना राबविण्यात आली आहे. सध्या येथे ३५ घरे बांधून तयार आहेत. या नवीन घरांत लवकरच आदिवासींचे पुनर्वसन केले जाणार आहे; परंतु येथे प्राथमिक सुविधांचा वणवा आहे. रस्ते, दिवाबत्ती व पाण्याची सुविधा अपूर्ण आहे. अंगणवाडी तयार नाही. त्यामुळे या सुविधांची पूर्तता झाल्याशिवाय स्थलांतरित होणार नाही, असा पवित्रा वारलीपाड्यातील आदिवासींनी घेतला आहे. यातच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने या आदिवासीपाड्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला येथील आदिवासींनी हुसकावून लावले. महापालिकेच्या भूमिकेचा वारलीपाडा गाव बचाव समितीने निषेध केला आहे.तर पावणे-खैरणे येथील श्रमिकनगरमधील आदिवासींसाठी महापालिकेने वाल्मीकी-आंबेडकर आवास योजनेअंतर्गत सहा इमारती बांधल्या आहेत; परंतु यातील घरे खुराड्यांच्या आकाराची असल्याने आदिवासींनी ती नाकारली आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून वापराविना पडून असल्याने या इमारतींची पडझड झाली आहे.या पडेल इमारतीतील घरांचा ताबा घ्यावा, यासाठी महापालिकेकडून अप्रत्यक्ष दबाव आणला जात असल्याचा आदिवासींचा आरोप आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहराचे नवनिर्वाचित महापौर जयवंत सुतार यांनी शनिवारी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकाºयांसह या आदिवासीपाड्यांना भेट देऊन त्यांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे येथील आदिवासींना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई