शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

उंबरखिंड तरुणाईसाठी प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:10 IST

३५८ वा विजय दिन; ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी जपल्या स्मृती; युद्धभूमीला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली

- नामदेव मोरे नवी मुंबई : खालापूर तालुक्यामधील उंबरखिंडची युद्धभूमी राज्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरू लागली आहे. ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी १६६१ मधील युद्धाच्या स्मृती जपल्या असून येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून येणाºयांची संख्याही वाढू लागली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा विश्वभर प्रसिद्ध आहे. स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांनी स्वत: अनेक लढायांचे नेतृत्व केले. त्यामध्ये महत्त्वपूर्ण लढाईमध्ये उंबरखिंडचाही समावेश आहे. पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाने ३० हजारांची फौज सोबत देऊन कारतलबखान व रायबागन यांना कोकण काबीज करण्यासाठी पाठविले. ही फौज लोहगडाच्या पायथ्याने लोणावळ्यावरून उंबरखिंडीतून खाली उतरू लागली. घनदाट अरण्य व अरुंद रस्ते यांच्यामध्ये महाराजांनी फौजेची कोंडी केली. त्यांना मिळणाºया पाण्याचीही रसद तोडली व मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ३० हजार सैन्याचा पराभव केला. २ फेब्रुवारी १६६१ ला कारतलब खानाने शरणागती पत्करली. तेव्हापासून उंबरखिंड इतिहासामध्ये अजरामर झाली. प्रत्येक वर्षी शेकडो शिवप्रेमी याठिकाणाला भेट देत असतात. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण देणाºया संस्थेमधील कमांडो एम. एम. औटी यांनी १९७४ मध्ये उंबरखिंडीमधील ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यास सुरवात केली. सन २००१ मध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर क्लब या संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी विजय दिन सोहळा आयोजित करण्यास सुरवात केली. २००४ मध्ये ठिकाणी विजयस्तंभ उभारण्याचे भूमिपूजन केले व २००७ मध्ये विजयाचे प्रतीक असणाºया स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून याठिकाणी भेट देणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.उंबरखिंड पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. लोणावळ्यापासून आंबेनळीच्या अवघड डोंगरातील पायवाटेने उंबरखिंडीच्या स्मारकापर्यंत येत आहेत. डोंगर उतरताना अजूनही अरुंद पायवाट व बाजूूला दाट झाडी आहे. डोंगरावरून चावणी गावही स्पष्ट दिसते. यामुळे कारतलब खानाचे सैन्य कसे उतरले असेल व महाराजांनी त्यांची कोंडी करून कशाप्रकारे पराभव केला याविषयीच्या घटनांना या प्रवासात उजाळा मिळत आहे. येणाºया नागरिकांना युद्धाची माहिती व्हावी यासाठी शिवदुर्ग मित्र संस्थेने माहितीफलकही लावले आहेत.विजयस्तंभावर युद्धाची माहितीउंबरखिंडीमध्ये उभारलेल्या विजयस्तंभावर १६६१ मधील युद्धाची थोडक्यात माहिती दिली आहे. महाराजांनी आयुष्यात स्वत: सहभाग घेतलेल्या लढाईमध्ये या लढाईचा समावेश आहे. मावळ्यांचा पराक्रम व गनिमी कावा याचे दर्शन या लढाईतून घडत आहे. विजयस्तंभाच्या दुसºया बाजूला महाराजांचे वृक्षसंवर्धन व लागवडीविषयी माहिती देणाºया अज्ञापत्रातील मजकूर देण्यात आला आहे.व्याख्यानाचे आयोजनउंबरखिंडीमध्ये शनिवारी ३५८ वा विजयदिन साजरा केला जात आहे. ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्यावतीने प्रत्येक वर्षी २ फेब्रुवारीला हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी दिगंबर पडवळ यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. सकाळी नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ चौक येथून कार्यक्रमस्थळापर्यंत शिवज्योत आणली जाणार आहे.उंबरखिंडच्या लढाईचे महत्त्व व तो समरप्रसंग राज्यातील घराघरात पोहचावा यासाठी सन २००० पासून प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या व पंचायत समितीच्या सहकार्याने येथे विजयदिन कार्यक्रम साजरा केला जात असून २००७ मध्ये विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.- सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र लोणावळा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई