शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

उंबरखिंड तरुणाईसाठी प्रेरणास्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:10 IST

३५८ वा विजय दिन; ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी जपल्या स्मृती; युद्धभूमीला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली

- नामदेव मोरे नवी मुंबई : खालापूर तालुक्यामधील उंबरखिंडची युद्धभूमी राज्यातील तरुणाईसाठी प्रेरणास्रोत ठरू लागली आहे. ग्रामस्थांसह शिवप्रेमींनी १६६१ मधील युद्धाच्या स्मृती जपल्या असून येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून येणाºयांची संख्याही वाढू लागली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा विश्वभर प्रसिद्ध आहे. स्वराज्याची निर्मिती करताना महाराजांनी स्वत: अनेक लढायांचे नेतृत्व केले. त्यामध्ये महत्त्वपूर्ण लढाईमध्ये उंबरखिंडचाही समावेश आहे. पुण्यामध्ये तळ ठोकून बसलेल्या शाहिस्तेखानाने ३० हजारांची फौज सोबत देऊन कारतलबखान व रायबागन यांना कोकण काबीज करण्यासाठी पाठविले. ही फौज लोहगडाच्या पायथ्याने लोणावळ्यावरून उंबरखिंडीतून खाली उतरू लागली. घनदाट अरण्य व अरुंद रस्ते यांच्यामध्ये महाराजांनी फौजेची कोंडी केली. त्यांना मिळणाºया पाण्याचीही रसद तोडली व मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन ३० हजार सैन्याचा पराभव केला. २ फेब्रुवारी १६६१ ला कारतलब खानाने शरणागती पत्करली. तेव्हापासून उंबरखिंड इतिहासामध्ये अजरामर झाली. प्रत्येक वर्षी शेकडो शिवप्रेमी याठिकाणाला भेट देत असतात. लोणावळा येथील आयएनएस शिवाजी या नौदलाच्या जवानांना प्रशिक्षण देणाºया संस्थेमधील कमांडो एम. एम. औटी यांनी १९७४ मध्ये उंबरखिंडीमधील ऐतिहासिक ठिकाणी भेट देण्यास सुरवात केली. सन २००१ मध्ये शिवदुर्ग मित्र लोणावळा ट्रेकिंग अँड अ‍ॅडव्हेंचर क्लब या संस्थेने ग्रामस्थांच्या मदतीने याठिकाणी विजय दिन सोहळा आयोजित करण्यास सुरवात केली. २००४ मध्ये ठिकाणी विजयस्तंभ उभारण्याचे भूमिपूजन केले व २००७ मध्ये विजयाचे प्रतीक असणाºया स्तंभाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून याठिकाणी भेट देणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून ही भूमी सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.उंबरखिंड पाहण्यासाठी विद्यार्थी व नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. लोणावळ्यापासून आंबेनळीच्या अवघड डोंगरातील पायवाटेने उंबरखिंडीच्या स्मारकापर्यंत येत आहेत. डोंगर उतरताना अजूनही अरुंद पायवाट व बाजूूला दाट झाडी आहे. डोंगरावरून चावणी गावही स्पष्ट दिसते. यामुळे कारतलब खानाचे सैन्य कसे उतरले असेल व महाराजांनी त्यांची कोंडी करून कशाप्रकारे पराभव केला याविषयीच्या घटनांना या प्रवासात उजाळा मिळत आहे. येणाºया नागरिकांना युद्धाची माहिती व्हावी यासाठी शिवदुर्ग मित्र संस्थेने माहितीफलकही लावले आहेत.विजयस्तंभावर युद्धाची माहितीउंबरखिंडीमध्ये उभारलेल्या विजयस्तंभावर १६६१ मधील युद्धाची थोडक्यात माहिती दिली आहे. महाराजांनी आयुष्यात स्वत: सहभाग घेतलेल्या लढाईमध्ये या लढाईचा समावेश आहे. मावळ्यांचा पराक्रम व गनिमी कावा याचे दर्शन या लढाईतून घडत आहे. विजयस्तंभाच्या दुसºया बाजूला महाराजांचे वृक्षसंवर्धन व लागवडीविषयी माहिती देणाºया अज्ञापत्रातील मजकूर देण्यात आला आहे.व्याख्यानाचे आयोजनउंबरखिंडीमध्ये शनिवारी ३५८ वा विजयदिन साजरा केला जात आहे. ग्रामपंचायत चावणी, पंचायत समिती खालापूर, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्यावतीने प्रत्येक वर्षी २ फेब्रुवारीला हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी दिगंबर पडवळ यांचे व्याख्यान ठेवण्यात आले आहे. सकाळी नेताजी पालकर यांचे जन्मस्थळ चौक येथून कार्यक्रमस्थळापर्यंत शिवज्योत आणली जाणार आहे.उंबरखिंडच्या लढाईचे महत्त्व व तो समरप्रसंग राज्यातील घराघरात पोहचावा यासाठी सन २००० पासून प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांच्या व पंचायत समितीच्या सहकार्याने येथे विजयदिन कार्यक्रम साजरा केला जात असून २००७ मध्ये विजयस्तंभ उभारण्यात आला आहे.- सुनील गायकवाड, सचिव, शिवदुर्ग मित्र लोणावळा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई