शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

शासनाच्या पथकाकडून नेरूळच्या पाणथळींची पाहणी; शासनास अहवाल देणार

By नारायण जाधव | Updated: March 8, 2024 15:02 IST

पर्यावरणप्रेमींनी केले स्वागत, नेरूळ येथील पाणथळी आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र वाचविण्यासाठी नवी मुंबईकरांनी तीव्र लढा सुरू केला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारुप विकास आराखड्यात नेरूळच्या एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळींच्या जागेवर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांची परवानगी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकमतने हा विषय लावून धरल्यानंतर जाग आलेल्या महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या पथकाने गुरुवारी या पाणथळींची पाहणी केली. हे पथक पाहणी केल्यानंतर स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींचे म्हणणे ऐकून तसा अहवाल शासनास सादर करणार असल्याची माहिती यासाठी पाठपुरावा करणारे पर्यावरणप्रेमी नागरिक सुनील अगरवाल यांनी दिली. मात्र, ज्या मिस्त्री कन्स्ट्रक्शनने येथील हिरवळीवर बांधकाम सुरू ठेवले आहे, त्यांचे पर्यवेक्षकही शासनाच्या पथकासह सोबत असल्याने अगरवाल यांनी नाराजी व्यक्त केली.

नेरूळ येथील पाणथळी आणि फ्लेमिंगो पक्ष्यांचे अधिवास क्षेत्र वाचविण्यासाठी नवी मुंबईकरांनी तीव्र लढा सुरू केला आहे. असे असताना नवी मुंबई महापालिकेेने राज्याचे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक यांचे, जिल्हाधिकारी यांचे निर्देश आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अव्हेरून आपल्या प्रारुप विकास आराखड्यात एनआरआयसह टीएस चाणक्य पाणथळींवर निवासी आणि वाणिज्यिक बांधकामे प्रस्तावित केली आहेत. महापालिकेचा हा निर्णय अवसानघातकी असून, शहराचे पर्यावरण बिघडविणारा असल्याची टीका सर्व थरातून होत आहे. याची दखल घेऊन शासनाच्या पथकाने या पाणथळींची गुरुवारी दिवसभर पाहणी केली.जिल्हानिहाय करणार पाहणीशासनाचे पथक नवी मुंबईतील पाणथळींसह राज्यातील जिल्हानिहाय सर्वच पाणथळींची पाहणी करणार आहे. या पाहणीनंतर ते शासनास आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी आम्हाला दिली असल्याचे अगरवाल यांनी लोकमतला सांगितले.

महापालिकेने आपल्या २०१८-१९ च्या पर्यावरणस्थिती अहवालातही शहरात २४.२२ टक्के वन, १२.२८ टक्के पाणथळी, ०.३२ टक्के तलाव क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. मात्र, आता याच १२.२८ टक्के पाणथळींचा महापालिकेने आपल्या प्रस्तावित प्रारुप विकास आराखड्यात नकार दिला आहे. हे खूपच संतापजनक आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणारे आहे. - सुनील अगरवाल, पर्यावरणप्रेमी