शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

By नामदेव मोरे | Updated: April 29, 2024 18:50 IST

फरसबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांची तेजी

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्यभर वाढलेल्या तापमानाचा भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घसरली असून, बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले असून, दुपारी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. बाजार समितीमध्ये सोमवारी ५३२ वाहनांमधून २०७९ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, यामध्ये चार लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.

मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाल्याचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर ९० ते १०० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबीचे दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. फ्लॉवरचे दर १२ ते १६ वरून १४ ते १८, घेवडा ३२ ते ४० वरून ३५ ते ४५ रुपये किलोंवर पोहोचले आहेत. शेवगा शेंगही २४ ते ३० वरून २५ ते ३५ रुपयांवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर, मेथी, पालक यांचे दरही वाढले आहेत. मुळा जवळपास मार्केटमधून गायब झाला आहे.

दुपारी भाजीपाल्याची दुकाने बंद

नवी मुंबईतील तापमानही ४२ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे शहरातील सर्व मंडईमधील भाजीपाल्याची दुकाने दुपारी १२ नंतर सायंकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. माल खराब होऊ नये यासाठी दुकानातील तापमान कमी ठेवण्यासाठी भाजीपाल्यावर पाण्याचा शिडकाव करावा लागत आहे. यानंतरही माल खराब होत असून, वजनावरही परिणाम होत आहे.

  • यांचे दर कडाडले- फरसबी, फ्लॉवर, घेवडा, काकडी, शेवगा शेंग, कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, वाटाणा.
  • या भाज्या नियंत्रणात- घेवडा, गवार, कारली, ढोबळी मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची
  • होलसेल व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव

भाजी - होलसेल - किरकोळ मार्केट

फरसबी - ९० ते १०० - १६० ते २००घेवडा - ३५ ते ४५ - १०० ते १२०काकडी - १६ ते २४ - ५० ते ६०शेवगा शेंग २५ ते ३५ - ६० ते ८०वाटाणा ९० ते ११० - १०० ते १२०

  • पालेभाज्यांचे प्रतीजुडी दर

भाजी- होलसेल - किरकोळ मार्केट

कोथिंबीर १४ ते १८ - २५ ते ३०मेथी १४ ते १८ - २५ ते ३०पालक १० ते १२ - २० ते २५

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला सुकण्याचे व खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात तेजीचे वातावरण आहे.-स्वप्निल घाग, भाजीपाला व्यापारी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई