शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

भाजीपाल्याला महागाईची फोडणी! तीव्र उकाड्याने आवक घटली; भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले

By नामदेव मोरे | Updated: April 29, 2024 18:50 IST

फरसबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांची तेजी

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: राज्यभर वाढलेल्या तापमानाचा भाजीपाल्याच्या पुरवठ्यावरही परिणाम होऊ लागला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घसरली असून, बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. फरसबी, फ्लॉवर, शेवगा शेंग, काकडीसह पालेभाज्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही वाढले असून, दुपारी दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. बाजार समितीमध्ये सोमवारी ५३२ वाहनांमधून २०७९ टन भाजीपाल्याची आवक झाली असून, यामध्ये चार लाख जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे.

मागणी व पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण झाल्याचा परिणाम बाजारभावावर होऊ लागला आहे. एक आठवड्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये फरसबी ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात होती. आता हे दर ९० ते १०० रुपये किलोंवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये फरसबीचे दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. फ्लॉवरचे दर १२ ते १६ वरून १४ ते १८, घेवडा ३२ ते ४० वरून ३५ ते ४५ रुपये किलोंवर पोहोचले आहेत. शेवगा शेंगही २४ ते ३० वरून २५ ते ३५ रुपयांवर पोहोचले आहेत.

कोथिंबीर, मेथी, पालक यांचे दरही वाढले आहेत. मुळा जवळपास मार्केटमधून गायब झाला आहे.

दुपारी भाजीपाल्याची दुकाने बंद

नवी मुंबईतील तापमानही ४२ अंशांवर पोहोचले आहे. यामुळे शहरातील सर्व मंडईमधील भाजीपाल्याची दुकाने दुपारी १२ नंतर सायंकाळी चार ते साडेचार वाजेपर्यंत बंद ठेवली जात आहे. माल खराब होऊ नये यासाठी दुकानातील तापमान कमी ठेवण्यासाठी भाजीपाल्यावर पाण्याचा शिडकाव करावा लागत आहे. यानंतरही माल खराब होत असून, वजनावरही परिणाम होत आहे.

  • यांचे दर कडाडले- फरसबी, फ्लॉवर, घेवडा, काकडी, शेवगा शेंग, कोथिंबीर, मेथी, मुळा, पालक, वाटाणा.
  • या भाज्या नियंत्रणात- घेवडा, गवार, कारली, ढोबळी मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची
  • होलसेल व किरकोळ मार्केटमधील बाजारभाव

भाजी - होलसेल - किरकोळ मार्केट

फरसबी - ९० ते १०० - १६० ते २००घेवडा - ३५ ते ४५ - १०० ते १२०काकडी - १६ ते २४ - ५० ते ६०शेवगा शेंग २५ ते ३५ - ६० ते ८०वाटाणा ९० ते ११० - १०० ते १२०

  • पालेभाज्यांचे प्रतीजुडी दर

भाजी- होलसेल - किरकोळ मार्केट

कोथिंबीर १४ ते १८ - २५ ते ३०मेथी १४ ते १८ - २५ ते ३०पालक १० ते १२ - २० ते २५

तीव्र उकाड्यामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला सुकण्याचे व खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे बाजारभावात काही प्रमाणात तेजीचे वातावरण आहे.-स्वप्निल घाग, भाजीपाला व्यापारी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई