शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

महाडमध्ये औद्योगिक वसाहतीत प्रदूषण जैसे थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 03:20 IST

प्रदूषण मंडळाचे मौन : कंपन्यांकडून नोटिसीला केराची टोपली

दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदूषणाबाबत पूर्वीपेक्षा चांगली स्थिती असल्याचे भासवले जात असले तरी वारंवार नाले रंगीत होणे, सकाळच्या सुमारास वायुप्रदूषण, नाल्यातील मासे मृत पावणे आदी घटना घडत आहेत. सातत्याने होत असलेल्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून केवळ नोटीस काढण्याची कारवाई करण्यात येत आहे. मात्र याबाबत बोलण्यास अधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

महाड औद्योगीक वसाहतीमध्ये बहुतांश कारखाने हे रासायनिक पदार्थ उत्पादन करणारे आहेत. यामुळे सातत्याने होत असलेल्या प्रदूषणाने महाड परिसर नापीक झाला आहे. येथील पिण्याचे पाण्याचे स्त्रोत आणि नद्या देखील प्रदूषित झाल्या आहेत. याचा परिणाम मानवी जीवनावर आणि निसर्गावर होत आहे. अनेक वेळा कारवाई करण्याच्या बतावण्या करणाऱ्या अधिकाºयांकडून समज नोटिसी आणि वेळ आल्यावर कारखाना बंदीच्या नोटिसी देण्यात आल्या आहेत. कंपनीमध्ये थातुरमातूर सुधारणा करून तसा अहवाल सादर करून या कंपन्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे महाड मधील सांडपाणी प्रदूषण हे कमी झाले असले तरी चोरमार्गाने आजही अनेक कारखाने सांडपाणी सोडून देण्याचे काम करत असल्याने महाड औद्योगिक वसाहतीमधील नाले रंगीत झाले आहेत.

गेला महिनाभर ई झोन, सी झोनमधील नाल्यात सातत्याने रंगीत पाणी येत आहे. याबाबत अनेक स्थानिक नागरिकांकडून प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांकडे तक्रारी करण्यात आली आहे. मात्र दूषित सांडपाणी नेमके येते कुठून याबाबत अद्याप तपासणी झालेली नाही. दोन दिवसापूर्वीच टेमघर नाल्यातील मासे मृत होण्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत देखील कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कंपन्यातील दूषित सांडपाणी पावासाचा आधार घेवून रात्रीच्या वेळेस सोडून देण्याचे प्रकार परिसरात वारंवार घडत आहेत. यामध्ये लघु उद्योजकांसह मोठया कंपन्यांचा देखील समावेश आहे. महाडमधील काही कंपन्या राजकीय दबाव आणून या अधिकाºयांना कारवाईपासून दूर ठेवतात. प्रदूषण मंडळाचे अधिकारीही राजकीय दबावाला घाबरून या कंपन्यांवर कारवाईसाठी पुढे येत नाही. केवळ नोटीसी बजावत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. महाडमधील सानिका केमिकल या कारखान्याला अनेकदा कारवाईच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत मात्र ठोस कारवाई झालेली नाही. याचप्रमाणे अनेक कारखानदार हे मुंबई स्थित असल्याने त्याठिकाणाहून वरीष्ठ अधिकाºयांचा दबाव आणला जातो. यामुळे स्थानिक पातळीवरील अधिकारी केवळ नोटीसी देण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत हे उघड झाले आहे.टेमघर नाल्याला आलेल्या पाण्याने मासे मृत पावले याबाबत दोन कंपन्यांना नोटिसा बजावल्या आहेत. येथील मीनाक्षी केमिकल या कारखान्याच्या कंपाऊंड शेजारीच रासायनिक पाण्याचा डोह तयार झाला आहे. मात्र याकडे देखील दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.औद्योगिक क्षेत्राला कोणी वालीच नाही...च्महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सध्या विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. कंपन्यांच्या कोणत्याच बाबातीत नियंत्रण राहीलेले नाही. कंपन्यांतील कामगार सुरक्षा, प्रदूषण आणि आरोग्य याबाबत कानाडोळा केला जात आहे. औद्योगिक क्षेत्राशी संबंधीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार सुरक्षा विभाग, औद्योगिक फायर अ‍ॅन्ड सेफ्टी विभाग, सेंट्रल आणि राज्य एक्साईज विभाग, अशा विभागाकडून त्यांचे अधिकार वापरले जात नाहीत. यामुळे महाडमध्ये किती तरी कंपन्या कागदावर बंद असल्या तरी त्याठिकाणी छुपे व्यवसाय सुरू आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpollutionप्रदूषण