शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

भाज्यांंची आवक वाढली, मागणी व पुरवठ्याचे गणित जुळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 02:46 IST

वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत.

- प्राची सोनवणे नवी मुंबई : वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून पालेभाज्या, गाजर, हिरवी मिरची यांची आवक वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात ५ ते १० रुपयांनी भाज्या स्वस्त झाल्या आहेत. पुढील कालावधीत भाज्या स्वस्त असतील, असा अंदाज घाऊक भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केला. गुरुवारी घाऊक भाजीपाला बाजारात एकूण ६४० गाड्या दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये कोबी, फ्लॉवर, गाजर, हिरवी मिरची तसेच पालेभाज्यांमध्ये पालक, शेपू, कोथिंबीर, मेथी, कांद्याची पात या भाज्या जास्त प्रमाणात बाजारात दाखल झाल्या आहेत.जोधपूर, इंदूरसह नाशिकमधील बाजारात गाजर दाखल होण्यास सुरुवात झाल्याने आवक वाढली आहे.तसेच हिरवी मिरची हैद्राबाद, कर्नाटक आणि फरसबी नाशिक, पुणे येथून दाखल होत आहे. तर नाशिक, पुणे भागातून हिरव्या पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. पुढील कालावधीत पालेभाज्या आणि गाजर, कोबी, फ्लॉवर या भाज्यांचे दर कमी राहतील,असा अंदाज घाऊक व्यापाºयांनी व्यक्त केला. ही आवक अखेरीस कमी होणार असल्याची शक्यता देखील व्यापाºयांकडून वर्तविण्यात आली आहे. शाळेला सुट्ट्या सुरू झाल्या की मागणी कमी होणार अशी प्रतिक्रिया व्यापाºयांनी व्यक्त केली.गेल्या वर्षी पाऊस उशिराने सुरू झाला त्यामुळे उत्पादन लांबले आणि त्यामुळे उष्णतेमध्येही मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली.जेवढी मागणी तेवढा पुरवठा असे गणित जुळून आले आहे. मात्र, उत्पादक भरडला जात असून, उत्पादनाचा खर्चही निघत नसल्याची खंत घाऊक भाजीपाला महासंघाचे सचिव प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली. उत्पादनाचा खर्च वाढत असून, माल मात्र त्या दरात विकला गेला पाहिजे, तरच उत्पादकांचा खरा फायदा होईल. उत्पादन घेणे स्वस्त झाले तर नक्कीच शेतकºयांचा फायदा होईल.अधिक उत्पादनासाठी खत टाकण्यात आले. असे असले तरी, भाजीपाल्याचे दर कवडीमोल असल्याने लागवड खर्च निघणेही कठीण असल्याची प्रतिक्रि या शेतकरी विजय दुधे यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात बाहेरील राज्यातून शेतमाल आल्याने दर घसरले. याचा फटका महाराष्ट्रातील भाजीपाला उत्पादकांना बसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.>गवार- २४०० ते ३४००कारले - १८०० ते २८००कोबी - ५०० ते ७००शिमला मिरची - १६०० ते २२००तोंडली - १५०० ते २०००वांगी - १००० ते १२००फरसबी - ३००० ते ३६००चवळी शेंग - १६०० ते २६००भेंडी - ३००० ते ३४००

टॅग्स :vegetableभाज्या