शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात तीन पट वाढ; कर्मचा-यांमध्ये आनंदाचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 02:01 IST

महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचा-यांना जादा कामासाठी अत्यंत कमी मोबदला मिळत होता. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कर्मचा-यांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे.

नवी मुंबई : महानगरपालिका अग्निशमन दलामधील कर्मचा-यांना जादा कामासाठी अत्यंत कमी मोबदला मिळत होता. महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी कर्मचाºयांच्या अतिकालिक भत्त्यामध्ये तीन पट वाढ केली आहे. कर्मचारी भरतीची प्रक्रियाही ५ सप्टेंबरपासून सुरू केली जाणार आहे. प्रलंबित प्रश्न सुटल्यामुळे कर्मचाºयांनी आयुक्तांचे आभार मानले आहेत.शहरातील १४ लाख नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त १३९ अग्निशमन कर्मचारी व अधिकाºयांवर अवलंबून आहे. कमी मनुष्यबळ असतानाही अग्निशमन जवान जीव धोक्यात घालून आग विझविण्याचे व प्रत्येक आपत्तीमध्ये शहरवासीयांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. शहरात अडकलेला पक्षी, मानवी वस्तीमध्ये शिरलेला साप, गणेशोत्सवापासून सर्व आपत्ती ओढविण्याच्या ठिकाणी अग्निशमन जवानांना तैनात रहावे लागते. कमी मनुष्यबळ असल्यामुळे अनेक कर्मचाºयांना ८ ऐवजी १६ तास कर्तव्यावर रहावे लागते. जवान विनातक्रार कर्तव्य बजावत आहेत. परंतु या जादा कामासाठी अत्यंत तुटपुंजा मोबदला दिला जात होता. आठ तास जादा काम केल्यानंतर फक्त १९० रुपये देण्यात येतात. सिडको, एमआयडीसी, नाशिक व इतर महापालिकांमध्ये मात्र यापेक्षा कित्येक पट जादा मोबदला दिला जात होता. अतिकालिक भत्त्याच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर आयुक्त रामास्वामी एन. यांनी तत्काळ दखल घेवून तब्बल तीनपटमोबदला वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.अग्निशमन दलामध्ये कार्यरत असलेल्या सहायक केंद्र अधिकाºयांना यापूर्वी प्रत्येक तासाला ३८ रुपये अतिकालिक भत्ता दिला जात होता, यामध्ये वाढ करून तो १३६ रुपये करण्यात आला आहे. अग्निशमन प्रणेताला ३३ वरून ९३ रुपये, चालक, आॅपरेटरला ३० वरून ११२ व अग्निशामकांना २४ वरून ७१ रुपये अतिकालिक भत्ता करण्यात आला आहे. तिप्पटपेक्षा जास्त वाढ केल्यामुळे अग्निशमन कर्मचाºयांनी समाधान व्यक्त केले आहे. महापालिका कार्यक्षेत्रामध्ये वाशी, ऐरोली, नेरूळ व सीबीडी अशी चार केंद्रे आहेत. कोपरखैरणेमध्ये नवीन केंद्र सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. महापालिकेच्या अग्निशमन दलामध्ये नवीन २६० कर्मचारी भरती केले जाणार आहेत. यासाठी ५ सप्टेंबरला जाहिरात प्रकाशित केली जाणार आहेआयुक्तांचे आभारमहापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर्मचाºयांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यावरही विशेष लक्ष दिले आहे. माध्यमिक शिक्षक, बालवाडी शिक्षिका, मदतनीस यांना वेतनवाढ दिली आहे. कंत्राटी कामगारांना किमान वेतन लागू केले असून फरकाची रक्कमही दिली आहे. यानंतर अग्निशमन कर्मचाºयांचा प्रश्नही सोडविला असून कर्मचाºयांनी आयुक्तांचे विशेष आभार मानले आहेत.अग्निशमन दल बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अतिकालिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. नवीन कर्मचारी भरती सुरू केली जात आहे. या विभागाशी संबंधित सर्व प्रश्न मार्गी लावले जात आहेत.- रामास्वामी एन.,आयुक्त, महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई