शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

जेएनपीटीमधील वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:16 IST

रिअल टाइम बेसिसवर होणार विश्लेषण : वायू गुणवत्ता, प्रदूषणाचे होणार परीक्षण; ठिकठिकाणी मोबाइल सेन्सर

उरण : भारताचे नंबर एकचे पोर्ट असलेले जेएनपीटीने शाश्वत विकास आणि पर्यावरणाच्या सवांदाचा भाग वायू गुणवत्ता नियंत्रण केंद्राची स्थापना केली. या केंद्रातून रिअल टाइम आधारावर, पोर्ट परिसरातील वायू गुणवत्ता, प्रदूषण पातळी आणि इतर संबंधित मापदंडांचेपरीक्षण करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन्स एनव्हायरमेंट प्रोग्राम (यूएनईपी)द्वारा घोषित करण्यात येणारी या वर्षीची थीम वायुप्रदूषण आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अशा प्रकारचे हरित उपक्रम राबविणे उचित ठरणार आहे, असे जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी सांगितले.

या उद्घाटनप्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले की, जेएनपीटीमध्ये आम्ही सतत पर्यावरणाला अनुकूल पर्याय शोधत असतो. ग्रीन पोर्ट बनण्याच्या प्रयत्नात अनेक पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

निरोगी आयुष्यासाठी गुणवत्तायुक्त हवा आणि पाणी हे महत्त्वाचे घटक आहेत आणि म्हणूनच पोर्ट म्हणून आम्ही हवेच्या शुद्धतेवर बारकाईने तपासणी करीत आहोत आणि ती शुद्धता कायम ठेवण्यासाठी वेळेवर सुधारात्मक उपाय करण्यात येत आहेत. या केंद्रामध्ये सुसज्ज नेटवर्क सह पोर्टवरील विविध ठिकाणी अनेक मोबाइल सेन्सर आणि स्थिर सेन्सर असणार आहेत. हे सेन्सर्स प्रत्येक सेकंदाला एकाच वेळी रिझोल्यूशनमध्ये हवामानविषयक विविध घातक स्तराच्या मापदंडांचे परीक्षण करतील.

सेन्सरद्वारे संग्रहित केलेल्या घटकांचे रिअल टाइम बेसिसवर विश्लेषण केले जाईल आणि डिजिटल बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. यात भर म्हणून कालांतराने जमा केलेली माहिती वातावरणासंबंधित उत्तम संग्रह असेल, ज्यामुळे पर्यावरणाच्या परिणामाच्या विविध कलाविषयी आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल.

या वेळी ‘विश्व पर्यावरण दिवस’ उत्सव म्हणून जेएनपीटीने इतर अनेक उपक्रमदेखील आयोजित केले होते. या दिवसाची सुरुवात जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी यांनी बंदराचे सर्व कर्मचारी तसेच पोर्ट यूजर्स यांना पर्यावरणा विषयी शपथ देऊन करण्यात आली. त्यानंतर प्रशासकीय इमारतीजवळ वृक्षारोपण करण्यात आले. ‘वायुप्रदूषण’ विषयावर एक पथनाट्य आयोजित करण्यात आले होते.