शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पहिल्याच पावसात बाजारसमितीची पोलखोल; कांदा-बटाटा मार्केट जलमय

By नामदेव मोरे | Updated: June 25, 2023 17:05 IST

राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने पावसाळा पूर्व नालेसफाई योग्य पद्धतीने केलेली नाही. पहिल्याच पावसात प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पोलखोल झाली असून कांदा - बटाटा मार्केट जलमय झाले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मार्केटला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोडवर खड्डे पडले आहेत. डीपी बॉक्स उघडे असून गटारे गाळाने भरून गेली आहेत.

राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. परंतु मागील काही वर्षांपासून बाजारपेठेमधील अत्यावश्यक कामेही वेळेवर होत नाहीत. कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषीत झाले असल्यामुळे प्रशासन गटर दुरूस्ती, नालेसफाई, खड्डे दुरूस्ती व इतर अत्यावश्यक कामेही वेळेत करत नाही. पावसाळा जवळ आल्यानंतरही अत्यावश्यक कामे केली जात नसल्यामुळे कांदा बटाटा अडत व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक कामे करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने पाहणी दौरा केला परंतु प्रत्यक्षात ठोस कामे झाली नाहीत. पहिल्याच पावसात संपूर्ण मार्केट जलमय झाले आहे. सर्व विंगमध्ये पाणी साचले आहे. गटारे तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा हाेत नाही. मार्केटमधील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचून तळी तयार झाली आहेत. मार्केटमधील सर्व विद्यूतडीपी बॉक्सची झाकणे उघडी आहेत. मार्केटमधील गटाराच्या झाकणाच्या ठिकाणचा भाग खचला आहे.तेथे धोक्याचा सूचना फलक लावण्यात आलेला नाही.

कांदा बटाटा मार्केटमध्ये पहिल्याच पावसाने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा केला आहे. अशीच स्थिती राहिली तर संपूर्ण पावसाळ्यात व्यापार कसा करायचा असा प्रश्न व्यापारी व कामगार व्यक्त करू लागले आहेत. गटारात पाणी साचत असल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू व मलेरीयाची साथ पसरण्याचा धोकाही वाढला आहे. गटारांवरील झाकणेही तुटली आहेत. अशा स्थितीमध्ये व्यापार करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :RainपाऊसMarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई