शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पहिल्याच पावसात बाजारसमितीची पोलखोल; कांदा-बटाटा मार्केट जलमय

By नामदेव मोरे | Updated: June 25, 2023 17:05 IST

राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीने पावसाळा पूर्व नालेसफाई योग्य पद्धतीने केलेली नाही. पहिल्याच पावसात प्रशासनाच्या निष्काळजीपणाची पोलखोल झाली असून कांदा - बटाटा मार्केट जलमय झाले आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे मार्केटला डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोडवर खड्डे पडले आहेत. डीपी बॉक्स उघडे असून गटारे गाळाने भरून गेली आहेत.

राज्यातील ३०६ बाजार समित्यांची शिखर संस्था व आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई बाजार समितीची ओळख आहे. परंतु मागील काही वर्षांपासून बाजारपेठेमधील अत्यावश्यक कामेही वेळेवर होत नाहीत. कांदा - बटाटा मार्केट धोकादायक घोषीत झाले असल्यामुळे प्रशासन गटर दुरूस्ती, नालेसफाई, खड्डे दुरूस्ती व इतर अत्यावश्यक कामेही वेळेत करत नाही. पावसाळा जवळ आल्यानंतरही अत्यावश्यक कामे केली जात नसल्यामुळे कांदा बटाटा अडत व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.

मुख्यमंत्र्यांनी अत्यावश्यक कामे करण्याचे आदेश दिल्यानंतर प्रशासनाने पाहणी दौरा केला परंतु प्रत्यक्षात ठोस कामे झाली नाहीत. पहिल्याच पावसात संपूर्ण मार्केट जलमय झाले आहे. सर्व विंगमध्ये पाणी साचले आहे. गटारे तुंबल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा हाेत नाही. मार्केटमधील रस्त्यांवर खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचून तळी तयार झाली आहेत. मार्केटमधील सर्व विद्यूतडीपी बॉक्सची झाकणे उघडी आहेत. मार्केटमधील गटाराच्या झाकणाच्या ठिकाणचा भाग खचला आहे.तेथे धोक्याचा सूचना फलक लावण्यात आलेला नाही.

कांदा बटाटा मार्केटमध्ये पहिल्याच पावसाने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडा केला आहे. अशीच स्थिती राहिली तर संपूर्ण पावसाळ्यात व्यापार कसा करायचा असा प्रश्न व्यापारी व कामगार व्यक्त करू लागले आहेत. गटारात पाणी साचत असल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यू व मलेरीयाची साथ पसरण्याचा धोकाही वाढला आहे. गटारांवरील झाकणेही तुटली आहेत. अशा स्थितीमध्ये व्यापार करायचा कसा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :RainपाऊसMarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई