शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

१० वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या होणार ४१ लाख, ठाणे खाडीसह पारसिक डोंगरामुळे हद्दवाढीच्या मर्यादा

By नारायण जाधव | Updated: August 29, 2022 16:25 IST

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

नवी मुंबई :

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. या विकास आराखड्यात सिडकोच्या जुन्या इमारतींसह टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील झोपड्यांच्या जागांवर निवासी वसाहती उभारण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या किमान २८ लाख ते कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज विकास आराखड्यात बांधला आहे.

महापालिकेची हद्द मर्यादित आहे. एका बाजूला ठाणे खाडीमुळे सीआरझेडचे बंधन, त्यात आता नुकताच मिळालेला रामसर क्षेत्राचा दर्जा, तर दुसरीकडे पारसिक डोंगराची भिंत. यामुळे शहराच्या आडव्या विस्तारावर मर्यादा आली आहे. मात्र, असे असले तरी तरी ३० वर्षांहून अधिक जुनी असलेली सिडकोची जुनी ९२८५६ घरे आणि शहरांतील ४८ झोपडपट्ट्यांत ४१८०५ झोपड्यांच्या जागेवर टोलेजंग वसाहती उभ्या करण्याचे संकेत विकास आराखड्यात देण्यात आले आहेत.

२००८ साली झाला होता झोपड्यांचा सर्व्हेमहापालिकेच्या २००८ च्या सर्व्हेनुसार एमआयडीसीच्या जमिनीवर २९ झोपडपट्ट्यांत २५ हजार ६१३, सिडको जमिनीवर १७ झोपडपट्ट्यांत आठ हजार ३२७ आणि महसूल विभागाच्या जमिनीवरील दोन झोपडपट्ट्यांत सात हजार ८०५ झोपड्यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने शहराचा व्हर्टिकल विकास करण्यावर महापालिकेने विकास आराखड्यात भर दिला आहे.

वन विभागासह एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक झोपड्यागेल्या २१ वर्षांत शहरांतील झोपड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वनविभागाच्या जमिनीवरही शेकडो झोपड्या वाढल्या आहेत, एमआयडीसीची मोठी जागा झोपडपट्टी माफियांनी गिळंकृत केली आहे

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत जादा चटईक्षेत्राचे गाजर२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार नवी मुंबई शहराची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ इतकी होती. गेल्या दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे. मात्र, राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने विकासकांना विकत वाढीव चटई निर्देशांक घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या पाच ते सहा वाढीव एफएसआयने टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. यात पुढील १२-१५ वर्षांत मोठी भर पडणार आहे. यामुळेच येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असे संकेत विकास आराखड्याने दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई