शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांत नवी मुंबईची लोकसंख्या होणार ४१ लाख, ठाणे खाडीसह पारसिक डोंगरामुळे हद्दवाढीच्या मर्यादा

By नारायण जाधव | Updated: August 29, 2022 16:25 IST

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत.

नवी मुंबई :

नवी मुंबई महापालिकेने आपला बहुचर्चित विकास आराखडा प्रकाशित करून त्यावर हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. या विकास आराखड्यात सिडकोच्या जुन्या इमारतींसह टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील झोपड्यांच्या जागांवर निवासी वसाहती उभारण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या किमान २८ लाख ते कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज विकास आराखड्यात बांधला आहे.

महापालिकेची हद्द मर्यादित आहे. एका बाजूला ठाणे खाडीमुळे सीआरझेडचे बंधन, त्यात आता नुकताच मिळालेला रामसर क्षेत्राचा दर्जा, तर दुसरीकडे पारसिक डोंगराची भिंत. यामुळे शहराच्या आडव्या विस्तारावर मर्यादा आली आहे. मात्र, असे असले तरी तरी ३० वर्षांहून अधिक जुनी असलेली सिडकोची जुनी ९२८५६ घरे आणि शहरांतील ४८ झोपडपट्ट्यांत ४१८०५ झोपड्यांच्या जागेवर टोलेजंग वसाहती उभ्या करण्याचे संकेत विकास आराखड्यात देण्यात आले आहेत.

२००८ साली झाला होता झोपड्यांचा सर्व्हेमहापालिकेच्या २००८ च्या सर्व्हेनुसार एमआयडीसीच्या जमिनीवर २९ झोपडपट्ट्यांत २५ हजार ६१३, सिडको जमिनीवर १७ झोपडपट्ट्यांत आठ हजार ३२७ आणि महसूल विभागाच्या जमिनीवरील दोन झोपडपट्ट्यांत सात हजार ८०५ झोपड्यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने शहराचा व्हर्टिकल विकास करण्यावर महापालिकेने विकास आराखड्यात भर दिला आहे.

वन विभागासह एमआयडीसीच्या जागेवर सर्वाधिक झोपड्यागेल्या २१ वर्षांत शहरांतील झोपड्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वनविभागाच्या जमिनीवरही शेकडो झोपड्या वाढल्या आहेत, एमआयडीसीची मोठी जागा झोपडपट्टी माफियांनी गिळंकृत केली आहे

एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीत जादा चटईक्षेत्राचे गाजर२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार नवी मुंबई शहराची लोकसंख्या ११ लाख २० हजार ५४७ इतकी होती. गेल्या दहा वर्षांत त्यात सहा लाखांची भर पडल्याचा अंदाज आहे. मात्र, राज्य सरकारने एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली मंजूर केल्याने विकासकांना विकत वाढीव चटई निर्देशांक घेण्याची मुभा मिळाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत सध्या पाच ते सहा वाढीव एफएसआयने टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. यात पुढील १२-१५ वर्षांत मोठी भर पडणार आहे. यामुळेच येत्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या कमाल ४१ लाखांपर्यंत वाढू शकते, असे संकेत विकास आराखड्याने दिले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई