शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

घरफोडी करणाऱ्या अंतरराज्य टोळीला अटक; ३० लाखाचा ऐवज हस्तगत

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 6, 2023 15:58 IST

नवी मुंबईसह मुंबई, गुजरात, राजस्थानमध्ये ५० हुन अधिक गुन्हे 

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : बंद घरांची रेकी करून घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यातील ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वाशीत घडलेल्या एका गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना या टोळीची माहिती मिळाली असता उत्तर प्रदेश व इतर ठिकाणी सापळे रचून त्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. 

वाशी सेक्टर ६ येथे घरफोडीची घटना जानेवारीत घडली होती. त्यामध्ये सुमारे एक कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वाशी पोलिसठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी निरीक्षक राजू सोनावणे, सहायक निरीक्षक प्रशांत तायडे, उपनिरीक्षक निलेश बारसे, हवालदार श्रीकांत सावंत, विनोद वारिंगे, सुनील चिकणे, चंदन म्हसकर आदींचे पथक तयार केले होते. या पथकाने सीसीटीव्ही व इतर तपासात संशयित गुन्हेगारांची माहिती मिळाली होती. त्यानुसार उत्तर प्रदेश तसेच इतर ठिकाणी सापळे रचून चौघांना अटक करण्यात आली. सूरज जिलेदार सिंग (३२), राजकुमार लालबहादूर सिंग ठाकूर (४२), राजकुमार रामकुमार पांचाळ (४३) व पूजा जाधव (३२) अशी त्यांची नावे आहेत. पांचाळ हा मध्यप्रदेशचा असून कोपर खैरणेत रहायला आहे. तो नवी मुंबईत ठिकठिकाणी बंद घरांची रेकी करून एखादा रो हाऊस जास्त दिवस बंद असल्याचे दिसून येताच बाकीच्या साथीदारांना त्याची माहिती देऊन बोलवून घ्यायचा. तर ठरलेल्या ठिकाणी घरफोडी केल्यानंतर सर्वजण पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी निघून जायचे. 

वाशीतील गुन्ह्याच्या तपासात सहायक निरीक्षक तायडे यांच्या पथकाला तायडे बद्दल माहिती मिळाली असता अधिक तपासात तो सूरज व इतरांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्यानुसार उत्तर प्रदेशमधून सूरजला अटक केल्यानंतर इतर दोघांना पकडण्यात आले. दरम्यान त्याने चोरीला ऐवज त्याच्या भाऊजीकडे ठेवत असल्याचेही समोर आले असता राजकुमार ठाकूर यालाही अटक करण्यात आली आहे. या टोळीकडून ९ गुन्ह्यांची उकल होऊन त्यामधील ३० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले. या टोळीवर नवी मुंबई, ठाणे, मुंबई याशिवाय गुजरात, राजस्थान येथे देखील घरफोडीचे ५० हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. 

फक्त रो हाऊसवर लक्ष

वाशी, कोपर खैरणे परिसरातल्या रो हाऊसवर या टोळीचे लक्ष असायचे. दाट लोकवस्तीपासून वेगळा भाग असल्याने व श्रीमंतांचे वास्तव्य असल्याने या टोळीकडून फक्त रो हाऊसची रेकी करून त्याच ठिकाणी घरफोडी केली जायची. त्यामुळे या टोळीने आजवर कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल हडपला आहे. 

संपर्कासाठी व्हाट्सअपचा वापर

सूरज हा सराईत गुन्हेगार असून १५ हुन अधिक वर्षांपासून तो घरफोडी करत आहे. एकमेकांसोबत फोनवर बोलल्यास पकडले जाऊ, या भीतीने सर्वजण डोंगलचे इंटरनेट वापरून व्हाट्सअपवर एकमेकांना संपर्क करत होते. त्यामुळे तांत्रिक तपासातही ते पोलिसांना चकमा देत होते. अखेर वाशीतल्या गुन्ह्यात ठश्यावरून पोलिस त्यांच्यापर्यंत पोचले.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी