शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:48 IST

देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास  दुप्पट वाढ झाली आहे. तूर डाळीचे दरही पाच वर्षात ४३ ते ६५ रुपये किलोवरून ९५ ते १३५ रुपये किलो झाले आहेत.डाळी व कडधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे चणा डाळ वगळता इतर सर्वच डाळींच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली  आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी ४ हजार टन अन्नधान्य, डाळी, कडधान्याची आवक होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कृषी माल येथे विक्रीला येत आहे. पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी १८ ते २२ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वारी होलसेल मार्केटमध्ये २६ ते ४३ रुपये दराने विकली जात आहे. 

गहू १९ ते २२ वरून २६ ते ४२, लोकवन गहू २१ ते २५ वरून २७ ते ४० रुपये दराने विकला जात आहे. साधा तांदूळ २१ ते २७ वरून ३२ ते ४८ रुपयांवर पोहोचला आहे.

डाळी कडधान्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मूग डाळ ५६ ते ६२ वरून ९० ते १३० रुपये किलोवर पोहोचली आहे. मसूर डाळ ३९ ते ४६ वरून ७० ते ८० रुपये किलो झाली आहे. यावर्षी जीवनावश्यक वस्तूंचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

होलसेलचे बाजारभाव

    २०१७    २०२३बाजरी    १८ ते २२    २६ ते ४३गहू    १९ ते २२    २६ ते ४२लोकवन गहू    २१ ते २५    २७ ते ४०ज्वारी    १८ ते २८    २८ ते ५५तांदूळ    २१ ते २७    ३२ ते ४८हरभरा डाळ    ६६ ते ७१    ५८ ते ६८मसूर    ४१ ते ४५    ६३ ते ७८मसूर डाळ    ३९ ते ४६    ७० ते ८०उडीद डाळ    ६० ते ७९    ९० ते ११२मूग    ५५ ते ७२    ८५ ते १२५मूग डाळ    ५६ ते ६२    ९० ते १३०तूर डाळ    ४३ ते ६५    ९५ ते १३५

डाळी, कडधान्याचा देशात तुटवडा आहे. देशात पुरेसे उत्पादन झालेले नाही. आयातही कमी होत आहे. यावर्षी पेरण्या वेळेत झालेल्या नाहीत. यामुळे अन्नधान्य, डाळींचे दर तेजीत राहतील. - नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट, मुंबई बाजार समिती

टॅग्स :Mumbaiमुंबई