शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

पाच वर्षांत तूरडाळीचे दर झाले दुप्पट, गहू, ज्वारी, बाजरीही आली तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 06:48 IST

देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : देशभरात मागील पाच वर्षांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गहू, ज्वारी, बाजरीच्या किमतीमध्ये जवळपास  दुप्पट वाढ झाली आहे. तूर डाळीचे दरही पाच वर्षात ४३ ते ६५ रुपये किलोवरून ९५ ते १३५ रुपये किलो झाले आहेत.डाळी व कडधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असल्यामुळे चणा डाळ वगळता इतर सर्वच डाळींच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली  आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सद्यस्थितीमध्ये सरासरी ४ हजार टन अन्नधान्य, डाळी, कडधान्याची आवक होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून कृषी माल येथे विक्रीला येत आहे. पाच वर्षांपासून अन्नधान्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पाच वर्षांपूर्वी १८ ते २२ रुपये किलो दराने विकली जाणारी ज्वारी होलसेल मार्केटमध्ये २६ ते ४३ रुपये दराने विकली जात आहे. 

गहू १९ ते २२ वरून २६ ते ४२, लोकवन गहू २१ ते २५ वरून २७ ते ४० रुपये दराने विकला जात आहे. साधा तांदूळ २१ ते २७ वरून ३२ ते ४८ रुपयांवर पोहोचला आहे.

डाळी कडधान्याच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे. मूग डाळ ५६ ते ६२ वरून ९० ते १३० रुपये किलोवर पोहोचली आहे. मसूर डाळ ३९ ते ४६ वरून ७० ते ८० रुपये किलो झाली आहे. यावर्षी जीवनावश्यक वस्तूंचे दर तेजीत राहण्याची शक्यता आहे.

होलसेलचे बाजारभाव

    २०१७    २०२३बाजरी    १८ ते २२    २६ ते ४३गहू    १९ ते २२    २६ ते ४२लोकवन गहू    २१ ते २५    २७ ते ४०ज्वारी    १८ ते २८    २८ ते ५५तांदूळ    २१ ते २७    ३२ ते ४८हरभरा डाळ    ६६ ते ७१    ५८ ते ६८मसूर    ४१ ते ४५    ६३ ते ७८मसूर डाळ    ३९ ते ४६    ७० ते ८०उडीद डाळ    ६० ते ७९    ९० ते ११२मूग    ५५ ते ७२    ८५ ते १२५मूग डाळ    ५६ ते ६२    ९० ते १३०तूर डाळ    ४३ ते ६५    ९५ ते १३५

डाळी, कडधान्याचा देशात तुटवडा आहे. देशात पुरेसे उत्पादन झालेले नाही. आयातही कमी होत आहे. यावर्षी पेरण्या वेळेत झालेल्या नाहीत. यामुळे अन्नधान्य, डाळींचे दर तेजीत राहतील. - नीलेश वीरा, संचालक, धान्य मार्केट, मुंबई बाजार समिती

टॅग्स :Mumbaiमुंबई