शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

पूरस्थितीमुळे स्थलांतरित डुंगी ग्रामस्थ चिंतेत; ओस पडलेल्या गावात चोरीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 4:25 AM

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.

- वैभव गायकरपनवेल : अतिवृष्टीमुळे डुंगी गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. गावात पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने संपूर्ण गावाला करंजाडे येथील शाळेत स्थलांतरित करण्यात आले. येथील शाळेमधील दोन वर्गात या ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र स्थलांतरित केलेले डुंगी ग्रामस्थ गावात चोरीच्या भीतीने चिंतेत आहेत.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात आलेल्या भरावामुळे डुंगी ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत. मागील वर्षी देखील गावात पुराचे पाणी शिरले होते. मध्यंतरी डुंगी गावाचे देखील पुनर्वसन करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तास प्रस्ताव सिडकोने शासनाकडे पाठविला आहे. मात्र गावात शिरलेल्या पाण्यामुळे संपूर्ण गावाचे येथील कारंजाडे शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित केल्यानंतर संपूर्ण डुंगी गाव ओस पडले आहे. ग्रामस्थांचे स्थलांतर केले असले तरी घरातील मौल्यवान वस्तू, सर्व सामान घरात असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत आणखीनच भर पडली आहे. करंजाडे येथील गावातील शाळेतील दोन वर्गात ग्रामस्थांची राहायची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडकोने वेळीच योग्य भूमिका घेतली नसल्याने ग्रामस्थांचे हाल सुरु आहेत. दरम्यान पावसाळ्यात ग्रामस्थांनी बाहेर राहण्यासाठी तहसील प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामस्थांना ५0 हजारांची मदत तहसीलदार अमित सानप यांनी केली. त्यानुसार बुधवारी ५0 हजारांचे धनादेश वाटप करण्यात आले. यामध्ये १११ कुटुंबांना धनादेशाचे वाटप करण्यात आले तर उर्वरित ३0 कुटुंबाची चाचपणी सुरु असल्याचे सानप यांनी सांगितले. लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी स्थलांतरित ग्रामस्थांची भेट घेवून सहकार्याचे आश्वासन दिले होते.पोलीस बळ पुरविण्याची मागणीस्थलांतरित झाल्यानंतर गाव ओस पडले आहे. गावातील विद्युत पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे. त्यामुळे रात्री चोरीची घटना होऊ शकते. अशा परिस्थितीत गावात विद्युत पुरवठा सुरळीत करून गावात पोलीस बंदोबस्त द्यावा जेणेकरून गावात अनुचित प्रकार होणार नसल्याची मागणी ग्रामस्थ महेंद्र पाटील, मधुकर नाईक यांनी केली आहे.बंबावी कोळीवाड्यालादेखील भरपाई द्याबंबावी कोळीवाड्यात देखील पूरसदृश स्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे.अनेक घरात पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाल्याने या ग्रामस्थांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मयूर भोईर यांनी सिडको व तहसीलदारांकडे केली आहे.

टॅग्स :panvelपनवेल