शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

अवैध प्रवासी वाहतुकीचे पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:00 IST

प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर; आरटीओ, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

नवी मुंबई : शहरातील नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीने शहरातील तसेच शहराबाहेरील विविध भागात एनएमएमटी बस सुरू केल्या आहेत; परंतु या मार्गावर बस फेऱ्यांची कमतरता असल्याने अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.नवी मुंबईतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्र माची सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना शहराबरोबर शेजारील कल्याण-डोंबिवली, उरण, मुंबई, पनवेल, ठाणे, मुंब्रा आदी शहरातदेखील मोठ्या प्रमाणावर जाळे पसरविले आहे; परंतु अनेक मार्गांवर बसची संख्या आणि बस फेºया कमी असल्याने टाटा मॅजिक, इको, सुमो आदी खासगी वाहनांमधून नेरुळ रेल्वेस्थानक, जुईनगर रेल्वेस्थानक, सानपाडा, महापे, खारघर, कल्याण, डोंबिवली, वाशी, पनवेल आदी भागात मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक केली जात आहे. अवैध वाहतूक करणाºया वाहनांमध्ये वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासीवाहतूक केली जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला आहे. उरण-जेएनपीटी भागात दररोज प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून, जुईनगर रेल्वेस्थानकापासून कोप्रोलीपर्यंत एनएमएमटीची ३४ क्र मांकाची बस धावते. या मार्गावर एनएमएमटीच्या १२ बस धावत असून, दिवसाला सुमारे ८० फेºया पूर्ण केल्या जात आहेत; परंतु या फेºयाही अपूर्ण पडत असल्याने तसेच प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्याची घाई असल्याने प्रवासी खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने अवैध प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांची संख्या वाढल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई