शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

महामार्गावरील बसथांब्यांवर बेकायदा प्रवासी वाहनांचा गराडा

By योगेश पिंगळे | Updated: April 14, 2024 17:09 IST

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; कारवाईची मागणी

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावरील वाशी, सानपाडा, नेरुळ, बेलापूर, खारघर, कामोठे, कळंबोली आदी बसथांब्यांवर खासगी वाहनचालकांकडून अवैध वाहतूक सुरू आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा निर्माण झाला आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या बसथांब्यांवर एसटी, बेस्ट, एनएमएमटी, केडीएमटी आदी परिवहन बसेसचे थांबे आहेत. शहरात तसेच राज्यातील विविध भागांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या बसथांब्यांवरून बस उपलब्ध होतात. या बसथांब्यांवर खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स बस, टेम्पो, जीप, ट्रँकर यासारखी वाहने बसथांब्यांवर प्रवासी घेण्यासाठी तासनतास उभी केली जात आहेत. दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एपीएमसी मार्केटमधून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर भागात जाणारे टेम्पो, ट्रॅकर देखील प्रवासी घेण्यासाठी या बसथांब्यांवर उभे असतात. तसेच पुणे, शिवाजीनगर आणि स्वारगेट भागात जाण्यासाठी महामार्गावरील बसस्टॉप परिसरात सकाळपासून खासगी चारचाकी वाहनांचा गराडा असतो.

या वाहनांमुळे एसटी किंवा परिवहन उपक्रमाच्या बसने प्रवास करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याने प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. बस थांब्यांवर उभ्या असलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून, लहान-मोठे अपघात देखील घडत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिक करत असून, अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई