शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 9, 2016 02:28 IST

दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे

नवी मुंबई : दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या खाली झोपडपट्टी वसली असून, धरण फुटल्यास किंवा पूर आल्यास पूर्ण वसाहत वाहून जाऊ शकते. इंग्रजांनी ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे सुरू केल्यानंतर वाफेच्या इंजिनासाठी आवश्यक पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी दिघा परिसरामध्ये धरण बांधले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या धरणाकडे सर्र्वांनीच दुर्लक्ष केले आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपूर्वी धरणाला भेट देऊन येथील पाणी दिघा परिसरातील रहिवाशांना पुरविले जाणार असल्याची घोषणा केली. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला असल्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याचा दावा केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रक काढून त्यांनी दिघा धरणासाठी कसा पाठपुरावा केला, याचा तपशील जाहीर केला. खासदार असताना केंद्र शासनाकडे दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. यामुळेच हा प्रश्न सुटला असल्याचे जाहीर केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये श्रेयाचे राजकारण सुरू झाले असल्यामुळे वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. १०० वर्षांपूर्वीच्या या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याचे स्ट्रक्चरल आॅडिट अद्याप झालेले नाही. धरणाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आहेत. धरणातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत झोपड्या झाल्या आहेत. भविष्यात धरण फुटले तर पूर्ण वसाहत वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिघा धरणाचा प्रश्न सोडविण्याचा दावा करण्यापूर्वी याविषयीची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. धरणाच्या बांधकामाची व्यवस्थित पाहणी करावी. आवश्यक डागडूजीचे काम करण्यात यावे. धरणाच्या पायथ्याला असलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाल्याने येथील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.