शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
2
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
3
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
4
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
5
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
6
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
7
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
8
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
9
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
10
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
11
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
12
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
13
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
14
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
15
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
16
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
17
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
18
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
19
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
20
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका

धरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 9, 2016 02:28 IST

दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे

नवी मुंबई : दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या खाली झोपडपट्टी वसली असून, धरण फुटल्यास किंवा पूर आल्यास पूर्ण वसाहत वाहून जाऊ शकते. इंग्रजांनी ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे सुरू केल्यानंतर वाफेच्या इंजिनासाठी आवश्यक पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी दिघा परिसरामध्ये धरण बांधले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या धरणाकडे सर्र्वांनीच दुर्लक्ष केले आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपूर्वी धरणाला भेट देऊन येथील पाणी दिघा परिसरातील रहिवाशांना पुरविले जाणार असल्याची घोषणा केली. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला असल्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याचा दावा केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रक काढून त्यांनी दिघा धरणासाठी कसा पाठपुरावा केला, याचा तपशील जाहीर केला. खासदार असताना केंद्र शासनाकडे दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. यामुळेच हा प्रश्न सुटला असल्याचे जाहीर केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये श्रेयाचे राजकारण सुरू झाले असल्यामुळे वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. १०० वर्षांपूर्वीच्या या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याचे स्ट्रक्चरल आॅडिट अद्याप झालेले नाही. धरणाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आहेत. धरणातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत झोपड्या झाल्या आहेत. भविष्यात धरण फुटले तर पूर्ण वसाहत वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिघा धरणाचा प्रश्न सोडविण्याचा दावा करण्यापूर्वी याविषयीची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. धरणाच्या बांधकामाची व्यवस्थित पाहणी करावी. आवश्यक डागडूजीचे काम करण्यात यावे. धरणाच्या पायथ्याला असलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाल्याने येथील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.