शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धरणाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

By admin | Updated: April 9, 2016 02:28 IST

दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे

नवी मुंबई : दिघा धरणाचे श्रेय घेण्यासाठी आजी - माजी खासदारांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या वादामुळे शंभर वर्षांपेक्षा जुन्या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. धरणाच्या खाली झोपडपट्टी वसली असून, धरण फुटल्यास किंवा पूर आल्यास पूर्ण वसाहत वाहून जाऊ शकते. इंग्रजांनी ठाणे ते मुंबई पहिली रेल्वे सुरू केल्यानंतर वाफेच्या इंजिनासाठी आवश्यक पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, यासाठी दिघा परिसरामध्ये धरण बांधले होते. परंतु स्वातंत्र्यानंतर या धरणाकडे सर्र्वांनीच दुर्लक्ष केले आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काही दिवसांपूर्वी धरणाला भेट देऊन येथील पाणी दिघा परिसरातील रहिवाशांना पुरविले जाणार असल्याची घोषणा केली. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविला असल्याची घोषणा केली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडविल्याचा दावा केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी खासदार संजीव नाईक यांनी पत्रक काढून त्यांनी दिघा धरणासाठी कसा पाठपुरावा केला, याचा तपशील जाहीर केला. खासदार असताना केंद्र शासनाकडे दिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. यामुळेच हा प्रश्न सुटला असल्याचे जाहीर केले. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये श्रेयाचे राजकारण सुरू झाले असल्यामुळे वास्तव परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जात आहे. १०० वर्षांपूर्वीच्या या धरणाची भिंत सुरक्षित आहे का, याचे स्ट्रक्चरल आॅडिट अद्याप झालेले नाही. धरणाच्या पायथ्याला मोठ्या प्रमाणात झोपड्या झाल्या आहेत. धरणातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याच्या दोन्ही बाजूंना अनधिकृत झोपड्या झाल्या आहेत. भविष्यात धरण फुटले तर पूर्ण वसाहत वाहून जाण्याची शक्यता आहे. यामुळे दिघा धरणाचा प्रश्न सोडविण्याचा दावा करण्यापूर्वी याविषयीची सर्व प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात यावी. धरणाच्या बांधकामाची व्यवस्थित पाहणी करावी. आवश्यक डागडूजीचे काम करण्यात यावे. धरणाच्या पायथ्याला असलेले अतिक्रमण तत्काळ हटविण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु श्रेय घेण्याची चढाओढ सुरू झाल्याने येथील समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.