शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

प्रसाधनगृहांच्या देखभालीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: January 6, 2017 05:53 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जुन्या शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचालयांची निर्मिती करण्याचे काम वेगाने सुरू आहे; पण सुरू असलेल्या शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरातील जुन्या शौचालयांची दुरुस्ती व नवीन शौचालयांची निर्मिती करण्याचे काम वेगाने सुरू आहे; पण सुरू असलेल्या शौचालयांच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदाराकडून नागरिकांची जादा पैशांसाठी अडवणूक सुरू असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही.स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने हागणदारीमुक्त नवी मुंबई करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कारवाईदरम्यान नागरिकांनी परिसरात प्रसाधनगृहच नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर नवीन प्रसाधनगृह उभारणी व जुन्या प्रसाधनगृहांची दुरुस्ती करण्याचे काम वेगाने सुरू आहे. जुन्या शौचालयांची दुरुस्ती व रंगरंगोटी केली जात असून पहिल्यांदाच प्रसाधनगृह बाहेरून स्वच्छ व सुंदर दिसू लागली आहेत; पण या प्रसाधनगृहांची देखभाल करण्यासाठी व संबंधित ठेकेदार नियमाप्रमाणे कार्यवाही करतात की नाही, याकडे लक्ष देणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. शहरातील प्रसाधनगृहांमध्ये गांजा विक्री होत असल्याचेही यापूर्वी निदर्शनास आले आहे. शौचास जाण्यासाठी नागरिकांकडून ५ रुपये शुल्क आकारले जात आहे. काही ठिकाणी दोन रुपये, तर काही ठिकाणी १ रुपया शुल्क घेतले जात आहे. प्रसाधनगृहांची योग्य प्रकारे स्वच्छता ठेवली जात नाही. नागरिकांसाठी तक्रारवही ठेवली जात नाही. सद्यस्थितीमध्ये ठेकेदाराचा व पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे नंबर दिले आहेत; पण त्याचाही फारसा उपयोग होत नाही. स्वच्छ भारत अभियानामध्ये प्रथम क्रमांक मिळावा, यासाठी प्रशासनाची धडपड सुरू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. स्वच्छतागृहांना रंगरंगोटी केली असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे; पण यापेक्षा येथील व्यवस्थापनाला शिस्त लावण्यात यावी व शुल्क आकारणीविषयी स्पष्टता असावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. अनेक ठिकाणी ठेकेदाराने नियुक्त केलेले कर्मचारी चुकीचे काम करत आहे. त्यांच्या मर्जीप्रमाणे प्रसाधनगृह उघडले जाते व बंद केले जाते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दिखावेगिरी थांबविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. अनेक ठिकाणी शौचालयांच्या बाहेर चांगले पोस्टर्स लावले आहेत; पण प्रत्यक्षात प्रसाधनगृह वापरण्यायोग्य नाही, यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)