शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

‘नैना’तील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष

By admin | Published: May 13, 2016 2:49 AM

बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या आत्महत्येनंतर नैना क्षेत्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या परिसरातील अतिक्रमणांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही

नामदेव मोरे,  नवी मुंबई बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या आत्महत्येनंतर नैना क्षेत्रातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे. या परिसरातील अतिक्रमणांवर कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही. काही व्यावसायिकांनी सिडको परवानगी देईल या भरवशावर बांधकामे सुरू केली आहेत. बिनधास्तपणे इमारती उभ्या केल्या जात असून त्यांना रोखण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये बांधकामासाठीची जमीन संपत आली आहे. शिल्लक जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे सद्यस्थितीमध्ये नैना परिसरामध्येच व्यवसायासाठी संधी शिल्लक आहे. या परिसराचा नियोजनबद्धपणे विकास करण्यासाठी शासनाने सिडकोची नियोजन प्राधिकरण म्हणून जानेवारी २०१३ मध्ये नियुक्ती केली आहे. विकास आराखडा तयार करून व त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम या यंत्रणेवर सोपविले आहे. परंतु नैना परिसरातील पायाभूत सुविधा व बांधकामांचा आराखडा तयार करण्यामध्येच तीन वर्र्षांचा कालावधी सिडकोला लागला आहे. पूर्वी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वर्षाला २५ ते ३० प्रस्तावांना बांधकाम परवानगी मिळत होती. परंतु सिडकोने तीन वर्षात फक्त २९ परवानग्या दिल्या आहेत. मंजुरी वेळेत मिळत नसल्याने गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान होवू लागले आहे. या परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पनवानगीचा विचार न करता इमारती उभ्या केल्या जात आहेत. बिनधास्तपणे बांधकाम सुरू असताना सिडको व इतर शासकीय यंत्रणा ते थांबविण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करू लागल्या आहेत. सिडकोकडे अतिक्रमण रोखण्यासाठी सक्षम यंत्रणाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईमध्ये विकासाची संधी कमी असल्यामुळे २००८ नंतर बांधकाम व्यावसायिकांनी पनवेल ग्रामीण परिसरावर लक्ष केंद्रित केले. परंतु नैनामुळे बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविल्या जात नसल्याने येथील विकास जवळपास ठप्प झाला आहे. बांधकाम व्यावसायिक राज कंधारी यांच्या आत्महत्येनंतर सिडकोने त्यांचा कोणताही प्रकल्प रखडविला नसल्याचा खुलासा केला आहे. स्वराज डेव्हलपर्सने वाकडी गावामध्ये ४१ हजार १७० क्षेत्रफळावर गृहबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी सिडकोकडे अर्ज केला होता. मार्च २०१५ मध्ये परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. सिडकोने दिलेल्या माहितीप्रमाणे सिडकोच्या पथकाने नोव्हेंबर २०१५ मध्ये प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली असता तिथे सहा माळ्यांचे बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आले. जवळपास तीन मजल्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते. परवानगीशिवाय हे बांधकाम केले होते. परंतु वास्तवामध्ये एवढे बांधकाम होईपर्यंत सिडको प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्लींथचे काम सुरू असतानाच थांबविले असते तर तीन मजले तयारच झाले नसते असे मत व्यक्त केले जात आहे.