शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
3
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
5
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
6
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
7
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
8
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
9
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
10
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
11
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
12
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
13
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
14
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
15
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
16
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
17
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
18
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
19
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
20
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...

सरकारने मागण्या मान्य न केल्यास बंद निश्चित - शशांक राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:46 IST

रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे.

नवी मुंबई : रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणे संपन्न झाला. या वेळी ३० जूनपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ जुलैपासून राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत बंद राहतील असा इशारा कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.राज्य सरकारने रिक्षांचे परमिट खुले केल्यापासून सर्वच प्रमुख शहरांमधील रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे भाडे मिळवण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद उद्भवू लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खुले करण्यात आलेले रिक्षा परमिट थांबवण्याची सर्वच रिक्षा संघटनांची मागणी आहे. त्याशिवाय भाडेवाढीला मंजुरी मिळावी व विम्याच्या रकमेत करण्यात आलेली भरमसाट वाढ कमी करावी अशी देखील त्यांची मागणी आहे. याकरिता आॅटो रिक्षा कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु सरकार दखल घेत नसल्याने ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलैपासून राज्यातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.त्या अनुषंगाने कोकणविभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणेत घेण्यात आला. सदर मेळाव्यास कोकण विभागातील रिक्षा व टॅक्सी संघटनांचे सुमारे ५०० हून अधिक पदाधिकारी व चालक उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना अध्यक्ष शशांक राव यांनी ३० जूनपर्यंतच्या मुदतीत सर्व मागण्यांची पूर्तता करावी, असे स्षष्ट केले.याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनीही रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांविषयी विधिमंडळात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, दशरथ भगत, भरत नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई