शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने मागण्या मान्य न केल्यास बंद निश्चित - शशांक राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:46 IST

रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे.

नवी मुंबई : रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणे संपन्न झाला. या वेळी ३० जूनपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ जुलैपासून राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत बंद राहतील असा इशारा कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.राज्य सरकारने रिक्षांचे परमिट खुले केल्यापासून सर्वच प्रमुख शहरांमधील रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे भाडे मिळवण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद उद्भवू लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खुले करण्यात आलेले रिक्षा परमिट थांबवण्याची सर्वच रिक्षा संघटनांची मागणी आहे. त्याशिवाय भाडेवाढीला मंजुरी मिळावी व विम्याच्या रकमेत करण्यात आलेली भरमसाट वाढ कमी करावी अशी देखील त्यांची मागणी आहे. याकरिता आॅटो रिक्षा कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु सरकार दखल घेत नसल्याने ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलैपासून राज्यातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.त्या अनुषंगाने कोकणविभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणेत घेण्यात आला. सदर मेळाव्यास कोकण विभागातील रिक्षा व टॅक्सी संघटनांचे सुमारे ५०० हून अधिक पदाधिकारी व चालक उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना अध्यक्ष शशांक राव यांनी ३० जूनपर्यंतच्या मुदतीत सर्व मागण्यांची पूर्तता करावी, असे स्षष्ट केले.याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनीही रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांविषयी विधिमंडळात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, दशरथ भगत, भरत नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई