शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सरकारने मागण्या मान्य न केल्यास बंद निश्चित - शशांक राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 02:46 IST

रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे.

नवी मुंबई : रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य करण्यास शासन टाळाटाळ करत असल्याने बंदची घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने कोकण विभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणे संपन्न झाला. या वेळी ३० जूनपर्यंत शासनाने मागण्या मान्य न केल्यास ९ जुलैपासून राज्यभरातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत बंद राहतील असा इशारा कृती समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला.राज्य सरकारने रिक्षांचे परमिट खुले केल्यापासून सर्वच प्रमुख शहरांमधील रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे भाडे मिळवण्यावरून रिक्षा चालकांमध्ये वाद उद्भवू लागले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी खुले करण्यात आलेले रिक्षा परमिट थांबवण्याची सर्वच रिक्षा संघटनांची मागणी आहे. त्याशिवाय भाडेवाढीला मंजुरी मिळावी व विम्याच्या रकमेत करण्यात आलेली भरमसाट वाढ कमी करावी अशी देखील त्यांची मागणी आहे. याकरिता आॅटो रिक्षा कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे; परंतु सरकार दखल घेत नसल्याने ३० जूनपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या मुदतीत प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलैपासून राज्यातील रिक्षा, टॅक्सी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.त्या अनुषंगाने कोकणविभागाचा मेळावा रविवारी कोपरखैरणेत घेण्यात आला. सदर मेळाव्यास कोकण विभागातील रिक्षा व टॅक्सी संघटनांचे सुमारे ५०० हून अधिक पदाधिकारी व चालक उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना अध्यक्ष शशांक राव यांनी ३० जूनपर्यंतच्या मुदतीत सर्व मागण्यांची पूर्तता करावी, असे स्षष्ट केले.याप्रसंगी आमदार संदीप नाईक यांनीही रिक्षा व टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांविषयी विधिमंडळात आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस बाबा कांबळे, कार्याध्यक्ष विलास भालेकर, दशरथ भगत, भरत नाईक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई