शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श…! सारेच विद्यार्थी झाले पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 23:59 IST

पनवेल पालिका क्षेत्रातील १ लाखाहून अधिक मुले गेली पुढच्या वर्गात

कळंबोली : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इयत्ता  पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा शासनाने रद्द केल्या आहेत. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, महापालिका शाळा, खासगी संस्था शाळेतील १ लाख ५२  हजार ८३  विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पुढील शैक्षणिक सत्रात सरळ प्रवेश दिला जाणार आहे. गतवर्षी कोरोनामुळे मार्चपासून शाळा बंद झाल्या होत्या. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची  वार्षिक परीक्षा रद्द करून सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यात आले होते. यंदाही तीच परिस्थिती उद्भवली आहे. याही वर्षी आधीच शाळा भरल्या नाहीत. काही वर्ग भरले तर तेही काही काळ सुरू राहिले. पालकांची मनस्थिती तयार होईपर्यंत दुसऱ्या कोरोनाची लाट आली. त्यामुळे राज्य सरकारने यंदाही पहिली ते आठवीपर्यंच्या विद्यार्थ्यांना  विनापरीक्षा पास केले आहे. यंदा शैक्षणिक वर्षापासून ऑनलाइन त्याचबरोबर जानेवारी ते मार्चपर्यंत ऑफलाइन अशा दोन्ही पध्दतीने शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आला आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून शालेय  शिक्षण विभागाकडून  पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला  आहे. पनवेल तालुक्यात ५५५ शाळा आहेत. यात जिल्हा परीक्षा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित व इंग्लिश स्कूल या शाळांचा समावेश होतो. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत १ लाख ५२ हजार ८३ विद्यार्थी संख्या आहे. यामुळे आता हे सर्व विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेश घेण्यास पात्र ठरले आहेत. तालुक्यातील शाळा व पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी शाळा    संख्या    विद्यार्थी संख्या जिल्हा परिषद    २४८    २१,६५६ महापालिका शाळा    ०११    ०१,९४१ खासगी शाळा    २९६     १,२८,४८६ एकूण    ५५५    १,५२,०८३पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यांची काळजी घेतली पाहिजे. मुलांच्या मूल्यमापनामध्ये अडचण असली तरी, शासनाकडून परीक्षा रद्द करून पास करण्याचा घेतलेला निर्णय  योग्यच निर्णय आहे. - बालाजी घुमे, शिक्षणतज्ज्ञ ऑनलाइन शिक्षण तसेच स्वाध्यायसारखा उपक्रम असेल त्यात अनेक दुर्गम भागातील मुले सहभागी झाली नव्हती. वाढता कोरोना असल्याने त्यांची काळजी करणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. पुढील वर्षी सुरुवातीला मागील वर्षाच्या अभ्यासक्रमाचा मात्र आढावा घ्यावा लागेल. - महेश खामकर, गटशिक्षणाधिकारी, पनवेल

टॅग्स :Educationशिक्षण