शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

अस्तित्वासाठी किणेंनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

By admin | Updated: November 18, 2016 03:01 IST

बदललेल्या प्रभागरचनेमुळे धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे गटनेते राजन किणे व त्यांच्या

कुमार बडदे / मुंब्राबदललेल्या प्रभागरचनेमुळे धोक्यात आलेले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसचे गटनेते राजन किणे व त्यांच्या सहकारी नगरसेविका रेश्मा पाटील यांच्यासह इतर दोन माजी नगरसेविकांनी मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच काँग्रेसचे इतरही काही नगरसेवक लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्य्रातून ठामपा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसचे आव्हान संपुष्टात येणार आहे. महापौर निवडणुकीत केलेल्या गद्दारीमुळे ते राष्ट्रवादीच्या रडारवर होते. भविष्यात राष्ट्रवादीकडूनच आपले सर्जिकल स्ट्राइक म्हणून त्यांनी त्याच पक्षात प्रवेश करून आपला स्वार्थ साधल्याची राजकीय वर्तुळात सुरस चर्चा सुरू आहे. विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात २००९ मध्ये विधानसभेची निवडणूक लढवून किणे यांनी ४५ हजार ८२१ मते मिळवून कडवी झुंज दिली होती. तेव्हापासून ते आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांमधील राजकीय हाडवैर प्रसिद्ध होते. तसेच मागील सात वर्षांत किणे आणि आव्हाड यांनी अनेकदा एकमेकांवर वैयक्तिक जाहीर आरोप केले होते. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेच्या मागील पाच निवडणुकांमध्ये कधी पक्षाच्या चिन्हावर, तर कधी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे किणे २०१२ मध्ये काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले होते. त्या निवडणुकीत ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. परंतु, त्यानंतरही त्यांच्याबरोबर असलेल्या राजकीय वैमनस्यामुळे राष्ट्रवादीने त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करून ते निवडून येऊ नयेत, यासाठी कसोशीने प्रयत्न केला होता. ही पार्श्वभूमी पाहता आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या मुंब्य्रात पराभव होण्याची त्यांना भीती होती. यामुळेच ते राष्ट्रवादीच्या तंबूत शिरल्याची चर्चा रंगू लागली आहे.