शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दगडखाणींच्या जागेवर घरकूल योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 02:13 IST

सिडकोच्या हालचाली : पन्नास हजार कुटुंबीयांवर बेकारीची कुºहाड

नवी मुंबई : गेल्या वर्षी यशस्वीरीत्या जाहीर केलेल्या १५ हजार घरांच्या योजनेनंतर सिडकोने आता गृहनिर्मिती क्षेत्रात अधिक आक्रमकपणे पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पुढील काही वर्षांत आणखी ९५ हजार घरे निर्माण करण्याचा विडा सिडकोने उचलला आहे. यातील काही घरे एमआयडीसी क्षेत्रातील दगडखाणींच्या जागेवर उभारण्याची संकल्पना आहे. त्यानुसार सिडकोने हालचालीसुद्धा सुरू केल्या आहेत. त्यामुळे दगडखाणींवर अवलंबून असलेल्या जवळपास ५० हजार कुटुंबीयांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवी मुंबईतील ठाणे-बेलापूर औद्योगिक क्षेत्राला लागून सिडकोने प्रकल्पग्रस्तांना सुमारे ७८ दगडखाणी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून वितरित केल्या आहेत. एमआयडीसीनेही या ठाणे-बेलापूर पट्ट्यात १५ तर वनविभागाने २७ दगडखाणींचे वाटप केले होते. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यकर्त्याने या दगडखाणींसंदर्भात पुणे येथील हरित लवादाकडे याचिका दाखल केली. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी गौणखनिज उत्खननाचे परवाने संबंधित भाडेपट्टाधारकांना वितरित करण्यास बंदी घातली होती. त्याचबरोबर सिडकोनेही संबंधित खाणमालकांना भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करण्यास मनाई केली होती. या कारणास्तव नवी मुंबईची जीवनरेषा म्हणून ओळखला जाणारा हा दगडखाण उद्योग व त्यावर अवलंबून असलेले अन्य उद्योग मागील तीन वर्षांपासून ठप्प पडले आहेत.हरित लवादाने १४ नोव्हेंबर २०१७ रोजी या संदर्भातील याचिका निकाली काढली. त्यानुसार संबंधित खाणपट्टाधारकाने पर्यावरण नियमांचे पालन केल्यावरच त्यांचे भाडेपट्टा नूतनीकरण करण्याचे आदेश

हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ, पर्यावरण महामंडळ, एमआयडीसी, सिडको संचालक इकॉलॉजी व माइन जिल्हाधिकारी ठाणे यांना दिले होते; परंतु या आदेशावर अंमलबजावणी न झाल्याने दगडखाण मालक आणि कामगारांत संबंधित प्रशासनाच्या विरोधात नाराजीचे सूर आहेत.मागील तीन वर्षांपासून हा प्रश्न जैसे थे असतानाच सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागेल त्याला घर या संकल्पनेनुसार शहरातील मोकळ्या आणि विनावापर पडून असलेल्या जागेवर घरे बांधण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यात मागील तीन वर्षांपासून बंद असलेल्या दगडखाणींच्या जागा अग्रस्थानी आहेत.प्रस्तावित ९५ हजार घरांपैकी काही घरे या दगडखाणींच्या जागेवर उभारण्याचा सिडकोचा मानस आहे. त्यानुसार प्राथमिक स्तरावर हालचालीसुद्धा सुरू असल्याचे समजते. त्यामुळे दगडखाणींवर काम करणाºया जवळपास ५० हजार कुटुंबीयांच्या रोजगारावर गदा येणार आहे.उपजीविकेचा प्रश्नतीन वर्षांपासून बंद असलेल्या दगडखाणी सुरू होण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, अशा अपेक्षा दगडखाणमालक आणि येथील कामगारांना आहेत. मात्र, सिडकोच्या भूमिकेनंतर दगडखाणी पुन्हा सुरू होण्याच्या सर्व शक्यता धुसर झाल्या आहेत. त्यामुळे जवळपास ५० हजार कुटुंबीयांना उपजीविकेच्या शोधात अन्यत्र स्थलांतर करावे लागणार आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई