शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल ओएनजीसी परिसरामध्ये वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:22 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे

पनवेल : जुन्या मुंबई पुणे महामार्गांवर कोकण रेल्वेच्या पुलाखाली ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी चालकांना तासन्तास रेंगाळत राहावे लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने, सखल भागात पाणी साचल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडदेखील उभारण्यात आले आहे. मात्र, ओएनजीसी परिसरात पुलाखाली पाणी साचते. वर रेल्वेचे ट्रॅक असल्याने या ठिकाणी एमएसआरडीसीला काहीही करता येत नाही. प्रशासनाच्या समन्वयाअभावी सध्याच्या घडीला येथील प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कोकण, पुण्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचले होते. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळेदेखील अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहनांची वर्दळ वाढत असल्याने सुमारे दोन ते तीन तास रांगा लागल्या होत्या. वाहनांची रांग थेट पनवेलजवळील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात पोहोचली होती. यावेळी पळस्पे फाट्याजवळ जाण्यासाठी नांदगाव मार्गे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. लहान पूल पाण्याखाली गेल्याने चालकांना कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले.शिवकर, काळुंदे भिंगार, कोन, आजिवली, पळस्पे, नांदगाव येथील नागरिकांना दररोज याच मार्गांवरून ये-जा करावी लागते. मात्र, या वाहतूककोंडीत अडकल्याने अवघ्या दहा मिनिटांसाठी रहिवाशांना दोन तास वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढत असल्याने, पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना तासन्तास वेळ, इंधन वाया घालवावे लागत आहे. या मार्गावर टोल वसूल करणाºया आयआरबी कंपनीला टोल घेण्याचा अधिकार नाही. सोमवारी आयआरबी प्रशासनाची भेट घेऊन, मार्ग त्वरित दुरुस्तीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. काळुंद्रे येथील रहिवासी विशाल म्हस्कर यांनीदेखील वाहतूककोंडीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले. मार्गावरून प्रवास करणे म्हणजे दोन तासांची रखडपट्टी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.2पाऊस पडल्यावर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते. पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी कोणतीही यंत्रणा राबविली जात नाही. एमएसआरडीसी , आयआरबी, पालिका या प्रशासनामार्फत एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.ओएनजीसी परिसरात साचलेले पाणी व पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसी प्रशासनाशी अनेक पत्रव्यवहार केले आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद दिला जात नाही. या वाहतूककोंडीमुळे वाहतुक पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- अभिजित मोहिते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल वाहतूक शाखा

टॅग्स :panvelपनवेलTrafficवाहतूक कोंडी