शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

पनवेल ओएनजीसी परिसरामध्ये वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:22 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे

पनवेल : जुन्या मुंबई पुणे महामार्गांवर कोकण रेल्वेच्या पुलाखाली ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी चालकांना तासन्तास रेंगाळत राहावे लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने, सखल भागात पाणी साचल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडदेखील उभारण्यात आले आहे. मात्र, ओएनजीसी परिसरात पुलाखाली पाणी साचते. वर रेल्वेचे ट्रॅक असल्याने या ठिकाणी एमएसआरडीसीला काहीही करता येत नाही. प्रशासनाच्या समन्वयाअभावी सध्याच्या घडीला येथील प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कोकण, पुण्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचले होते. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळेदेखील अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहनांची वर्दळ वाढत असल्याने सुमारे दोन ते तीन तास रांगा लागल्या होत्या. वाहनांची रांग थेट पनवेलजवळील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात पोहोचली होती. यावेळी पळस्पे फाट्याजवळ जाण्यासाठी नांदगाव मार्गे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. लहान पूल पाण्याखाली गेल्याने चालकांना कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले.शिवकर, काळुंदे भिंगार, कोन, आजिवली, पळस्पे, नांदगाव येथील नागरिकांना दररोज याच मार्गांवरून ये-जा करावी लागते. मात्र, या वाहतूककोंडीत अडकल्याने अवघ्या दहा मिनिटांसाठी रहिवाशांना दोन तास वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढत असल्याने, पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना तासन्तास वेळ, इंधन वाया घालवावे लागत आहे. या मार्गावर टोल वसूल करणाºया आयआरबी कंपनीला टोल घेण्याचा अधिकार नाही. सोमवारी आयआरबी प्रशासनाची भेट घेऊन, मार्ग त्वरित दुरुस्तीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. काळुंद्रे येथील रहिवासी विशाल म्हस्कर यांनीदेखील वाहतूककोंडीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले. मार्गावरून प्रवास करणे म्हणजे दोन तासांची रखडपट्टी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.2पाऊस पडल्यावर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते. पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी कोणतीही यंत्रणा राबविली जात नाही. एमएसआरडीसी , आयआरबी, पालिका या प्रशासनामार्फत एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.ओएनजीसी परिसरात साचलेले पाणी व पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसी प्रशासनाशी अनेक पत्रव्यवहार केले आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद दिला जात नाही. या वाहतूककोंडीमुळे वाहतुक पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- अभिजित मोहिते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल वाहतूक शाखा

टॅग्स :panvelपनवेलTrafficवाहतूक कोंडी