शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

पनवेल ओएनजीसी परिसरामध्ये वाहनचालकांची तासन्तास रखडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 02:22 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे

पनवेल : जुन्या मुंबई पुणे महामार्गांवर कोकण रेल्वेच्या पुलाखाली ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पाच मिनिटांच्या प्रवासासाठी चालकांना तासन्तास रेंगाळत राहावे लागत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने, सखल भागात पाणी साचल्याने ही स्थिती उद्भवली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. पनवेल परिसरातील ओएनसीजी येथील रस्त्याचेही काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूला सर्व्हिस रोडदेखील उभारण्यात आले आहे. मात्र, ओएनजीसी परिसरात पुलाखाली पाणी साचते. वर रेल्वेचे ट्रॅक असल्याने या ठिकाणी एमएसआरडीसीला काहीही करता येत नाही. प्रशासनाच्या समन्वयाअभावी सध्याच्या घडीला येथील प्रवास प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

कोकण, पुण्याकडे जाण्यासाठी या मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी साचले होते. या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळेदेखील अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी वाहनांची वर्दळ वाढत असल्याने सुमारे दोन ते तीन तास रांगा लागल्या होत्या. वाहनांची रांग थेट पनवेलजवळील पंचमुखी मारुती मंदिर परिसरात पोहोचली होती. यावेळी पळस्पे फाट्याजवळ जाण्यासाठी नांदगाव मार्गे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरही वाहतूककोंडी झाली होती. लहान पूल पाण्याखाली गेल्याने चालकांना कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले.शिवकर, काळुंदे भिंगार, कोन, आजिवली, पळस्पे, नांदगाव येथील नागरिकांना दररोज याच मार्गांवरून ये-जा करावी लागते. मात्र, या वाहतूककोंडीत अडकल्याने अवघ्या दहा मिनिटांसाठी रहिवाशांना दोन तास वाहतूककोंडीत अडकावे लागत आहे. पावसाळ्यात ही समस्या आणखी वाढत असल्याने, पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. काही मिनिटांच्या प्रवासासाठी प्रवाशांना तासन्तास वेळ, इंधन वाया घालवावे लागत आहे. या मार्गावर टोल वसूल करणाºया आयआरबी कंपनीला टोल घेण्याचा अधिकार नाही. सोमवारी आयआरबी प्रशासनाची भेट घेऊन, मार्ग त्वरित दुरुस्तीची मागणी करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. काळुंद्रे येथील रहिवासी विशाल म्हस्कर यांनीदेखील वाहतूककोंडीमुळे त्रस्त असल्याचे सांगितले. मार्गावरून प्रवास करणे म्हणजे दोन तासांची रखडपट्टी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे.2पाऊस पडल्यावर या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते. पाण्याचा निचरा करण्यासाठी या ठिकाणी कोणतीही यंत्रणा राबविली जात नाही. एमएसआरडीसी , आयआरबी, पालिका या प्रशासनामार्फत एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.ओएनजीसी परिसरात साचलेले पाणी व पडलेल्या खड्ड्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एमएसआरडीसी प्रशासनाशी अनेक पत्रव्यवहार केले आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक प्रतिसाद दिला जात नाही. या वाहतूककोंडीमुळे वाहतुक पोलिसांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.- अभिजित मोहिते,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,पनवेल वाहतूक शाखा

टॅग्स :panvelपनवेलTrafficवाहतूक कोंडी