शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

नवी मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना कोरोनाचा फटका, ग्राहकांची संख्या रोडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 03:45 IST

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत

नवी मुंबई : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाकडून गर्दी जमण्याच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच खबरदारीचा उपाय म्हणून काही हॉटेल व्यावसायिकांनीही स्वेच्छेने व्यवसाय बंद करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे नेहमीची वर्दळीची असणारी ठिकाणेही ओस पडली आहेत.राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येचे गांभीर्य व्यक्त केले जात आहे. नवी मुंबईतही कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून त्या शहराबाहेरील आहेत; परंतु त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिकेने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामध्ये उद्याने, हॉल, नाट्यगृह, चित्रपटगृहे यांचा समावेश आहे. त्याशिवाय सार्वजनिक सभा व कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. गर्दीच्या ठिकाणी एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा वावर झाल्यास अनेकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, तर त्यांच्या माध्यमातून हा संसर्ग अधिक फैलावण्याचा धोका आहे. त्यामुळे हॉटेल व बारही ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवले जावेत, अशी मागणी होत आहे; परंतु प्रशासनाने जरी त्यासंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नसला, तरी काही हॉटेल व्यावसायिकांनी मात्र स्वेच्छेने व्यवसाय बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे. यामुळे त्यांना रोजचा १० ते ५० हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. तर जे हॉटेल अद्यापही सुरू ठेवण्यात आले आहेत, त्या ठिकाणी नागरिकच जायचे टाळत आहेत, यामुळे नेहमी ग्राहकांची वर्दळ असणारी हॉटेल मागील दोन दिवसांपासून ओस पडली आहेत; परंतु हॉटेल व बार यामध्ये जमणाऱ्या गर्दीच्या बाबतीत प्रशासनाने अद्याप गांभीर्य घेतले नसल्याची टीका सर्वसामान्यांकडून होत आहे. परिणामी, शहरातील सर्व्हिसबार व बेकायदेशीरपणो चालणारे डान्सबार अद्यापही रात्री उशिरापर्यंत चालवले जात आहेत.हॉटेलचालक संघटनेच्या निर्णयाकडे लक्षहॉटेलमध्ये ग्राहकांच्या स्वरूपात जमणारी गर्दी कोरोनाच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरू शकते. यानंतरही इतर आस्थापने व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेणाºया प्रशासनांना हॉटेल व बारचा विसर पडल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, काही व्यावसायिकांनी स्वेच्छेने हॉटेल्स बंद ठेवली आहेत. हॉटेलचालक संघटना काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सुरक्षेसाठी हॉटेल बंद करून कामगारांनाही सुट्टी देण्यात आली आहे, यामुळे रोजचे २० ते २५ हजार रुपयांचे नुकसान होत आहे; परंतु स्वत:च्या तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने इतर हॉटेल व्यावसायिकांनीही तसा निर्णय घेणे गरजेचे आहे.- संदीप पाटील, हॉटेल व्यावसायिक, कोपरखैरणे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईhotelहॉटेल