शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

रायगडचे निर्माते हिरोजी इंदुलकरांचा सन्मान; नगररचना अधिकाऱ्यांना पुरस्कार देऊन करणार गौरव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 08:11 IST

मंत्रालयस्तरावर ५, विभाग स्तरावर तांत्रिक संवर्गाचे १७ आणि अतांत्रिक संवर्गाचे ८ असे एकूण ३० पुरस्कारांनी दरवर्षी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

नारायण जाधव 

नवी मुंबई - हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड किल्ल्याचे निर्माते स्वराज्य अभियंता हिरोजी इंदुलकरांचा आता राज्य सरकार अनोख्या पद्धतीने सन्मान करणार आहे. राज्यातील विविध शहरांच्या नगररचनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता हिरोजी इंदुलकरांच्या नावे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दरवर्षी ३१ जानेवारी या नगररचना दिनाच्या दिवशी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

मंत्रालयस्तरावर ५, विभाग स्तरावर तांत्रिक संवर्गाचे १७ आणि अतांत्रिक संवर्गाचे ८ असे एकूण ३० पुरस्कारांनी दरवर्षी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश येथील कोकण भवनात प्राप्त झाले आहेत. हिरोजी इंदुलकर यांनी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यासह महाराजांच्या अनेक गडकोट किल्ल्यांच्या निर्मितीत मोठे योगदान  दिल्याचे सांगितले जाते; पण रायगडसारखा अभ्यद्य आणि वास्तुरचनेचा अत्युच्च नमुना असलेला किल्ला हिराेजींच्या स्थापत्य ज्ञानाची साक्ष देतो. त्यांचा प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, याची  प्रेरणा आताच्या पिढीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांत रुजावी, या हेतूने पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अधिकाऱ्यांचे हे गुण लक्षात घेणारअधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गेल्या पाच वर्षांतील गोपनीय अहवाल, त्यांची कामातील सचोटी, वक्तशीरपपणा, कामाची क्षमता, केलेल्या कामांचा निपटारा, कामाविषयीचे ज्ञान, सामान्य ज्ञान, संवादकौशल्य, नावीन्यपणा, निपक्षपणा, निर्णयक्षमता, प्रामाणिकपणा आदी गुण लक्षात घेऊन हे पुरस्कार देऊन गुणवंत अधिकाऱ्यांना हिरोजी इंदुलकरांच्या नावाने गौरविण्यात येणार आहे.