शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
3
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
4
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
5
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
6
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
7
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
8
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
9
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
10
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
11
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
12
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
13
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
14
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
15
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
16
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
17
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
18
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
19
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
20
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा

डिझेल नसल्याने कळंबोलीतील होल्डिंग पंप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:59 IST

वसाहतीत पाणीच पाणी; सिडकोचे दुर्लक्ष

कळंबोली : कळंबोली सिडको वसाहतीतील पावसाळी नाल्यातील पाणी वसाहती बाहेर म्हणजेच जलधारण तलावात सोडले जाते. शनिवारपासून होल्डिंग पॉईंटवरील पंप डिझेल नसल्याने बंद ठेवले आहे. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच कळंबोली वसाहत पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली. सिडकोकडून आपत्ती व्यवस्थापनाकडे जानिवपुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.कळंबोली सेक्टर ४ येथे होल्डिंग पॉईंट आहे. या पॉईंटवर सहा पंप बसवण्यात आले आहेत. याद्वारे वसाहतीतील नाल्यातील पाणी पंपाद्वारे जलधारण तलावात सोडले जाते. पुढे ते पाणी रोडपाली खाडीला मिसळते. कळंबोली वसाहत ही समुद्र सपाटीपासून तीन मीटर खाली असल्याने दरवर्षी कळंबोलीत पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पावसाच्या दिवसात हे पंप चोविस तास चालू असतात. त्यामुळे वसाहतीतील पाणी साचण्याचे प्रमाण कमी असते. परंतु शनिवारपासून पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने कळंबोली वसाहतीत शनिवारी रात्रीपासूनच सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.होल्डिंग पंपासाठी लागणारे डिझेल संपल्यामुळे ते बंद ठेवण्यात आले. सिडकोने नेमुन दिलेल्या ठेकेदाराने डिझेल पुरवणे अपेक्षित असताना तसे न झाल्याचे महापालिकेचे आरोग्य निरिक्षक दौलत शिंदे यांच्या पाहणीत लक्षात आले. त्यानुसार ठेकेदाराला जाब विचारताच अरेरावीची भाषा तसेच उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले. होल्डिंग पंप बंद असल्यामुळे रविवारी सकाळी अनेक बैठ्या घरात पाणी शिरले होते. तर सेक्टर ४, ६, १०,१४ मधील रस्ते पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत झाले. पाण्याचा निचरा न झाल्याने वसाहतीत दीड ते दोन फूट पाणी साचले होते. काही भागात वाहने बंद पडली होती.रस्त्यावर पाणी साचल्याने दिवसभर त्यातून मार्ग काढणे जिकरीचे बनले होते. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांच्याशी संपर्क साधला असता होल्डिंग पंपाची पाहणी करुन डिझेल संपले असेल तर त्याबाबत ठेकेदास सूचना केल्या जातील व लवकर पंप चालू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगण्यात आले.कातकर वाडीतही पाणी शिरलेरोडपाली येथील कासाडी नदी लगत असलेली कातकरवाडीत नदीचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले. घराघरात पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नागरीकांचे नुकसानही झाले आहे. रविवारी पावसाचा जोर वाढल्याने रहिवाशांना महापालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेकडून कळंबोली येथील काळभैरव मंगल कार्यालयात हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस