शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

समाधीस्थळी बनणार इतिहास अभ्यास केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 03:44 IST

शासनाकडे पाठपुरावा सुरू : बाळाजी चिटणीस यांचे समाधीस्थळ संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी

नामदेव मोरेनवी मुंबई : सुधागड तालुक्यामधील आवंढे येथे स्वराज्यातील अष्टप्रधानांपैकी एक बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे. हे समाधीस्थळ संरक्षित स्मारक घोषित करावे. पर्यटनस्थळांच्या यादीमध्ये त्याचा समावेश करावा, अशी मागणी बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टने केली आहे. समाधीस्थळी इतिहास अभ्यास केंद्र उभारण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी जिल्हा परिषद, शासन व पुरातत्त्व विभागाकडेही पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरू केला आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेमुळे छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची गाथा प्रत्येक घराघरांमध्ये पोहोचू लागली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुकाही चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेबाचा मुलगा अकबर यांची भेट झालेली होती. गडापासून काही अंतरावर असलेल्या परळीजवळील आवंढे गावच्या हद्दीमध्ये अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो व इतरांना हत्तीच्या पायी देण्यात आले होते. गैरसमजातून बाळाजी आवजी चिटणीस यांनाही शिक्षा देण्यात आली होती; परंतु नंतर ते निर्दोष असल्याचे लक्षात आल्याने त्या ठिकाणी बाळाजींची छोटी समाधी बनविण्यात आली होती. तीन शतकांपासून ग्रामस्थांनी या समाधीची देखभाल केली आहे. त्रिपुरारी पोर्णिमेला येथे दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. ग्रामस्थच समाधीची देखभाल करत आले आहेत. ग्रामस्थ व बाळाजींचे वारसदार यांनी बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली असून, त्या माध्यमातून येथे कार्यक्रम केले जातात. ट्रस्टने २०१३ पासून जि. परिषद, राज्य शासन, पुरातत्त्व विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून या समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.पाच वर्षांपूर्वी समाधीस्थळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते, यानंतर आमदार धैर्यशील पाटील यांनी या परिसरातील रोडसाठी आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेमध्ये २०१७ मध्ये समाधीस्थळाला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासाठीचा ठराव मंंजूर केला आहे. समाधीस्थळाजवळील दोन एकर जमीन शासनाने संपादित करून ट्रस्टच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे. शासनाने पुरातत्त्व विभागाला उचित कार्यवाही करण्यास सुचविले आहे. पुरातत्त्व विभागाचे तत्कालीन संचालक भा. वि. कुलकर्णी यांनी या ठिकाणाची पाहणी करून समाधीस्थळ संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. या ठिकाणी संरक्षित स्मारक घोषित झाल्यानंतर तेथे इतिहास अभ्यास केंद्र उभे करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.समाधीस्थळाचा असा होणार विकासच्बाळाजी आवजी चिटणीस ट्रस्टचे अध्यक्ष सातारा येथील शिरीष चिटणीस असून, संजय चिटणीस हे सचिव आहेत. आमदार धैर्यशील पाटील कार्याध्यक्ष असून, साहित्यिक सदानंद मोरे, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे व आवंढे येथील इतर मान्यवरही ट्रस्टमध्ये आहेत. मोरे व बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केंद्राची रूपरेषा निश्चित केली आहे.च्बाळाजी आवजी चिटणीस यांच्या हस्ताक्षरातील २५० पत्रे उपलब्ध आहेत. यामधील काही मुंबईमधील एल्फिन्स्टन महाविद्यालय व काही कोल्हापूरमधील शाहू दफ्तरात आहेत. ही पत्रे अभ्यासासाठी उपलब्ध केली जाणार आहेत.च्छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील ग्रंथही येथे ठेवण्यात येणार आहेत. बाळाजी आवजी यांचा इतिहास. खंडोबल्लाळ चिटणीस यांनी केलेले कार्यही चित्ररूपाने येथे रेखाटण्याचा संकल्प असल्याची माहिती संजय चिटणीस यांनी दिली.रायगड जिल्हा परिषदेने २०१७ ला ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ घोषित करण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. पुरातत्त्व विभागानेही संरक्षित स्मारक घोषित करण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे. समाधीस्थळाचा विकास करून इतिहास अभ्यास केंद्र तयार करण्याचा संकल्प आहे.- संजय चिटणीस, सचिव, बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टगावच्या परिसरामध्ये बाळाजी आवजी चिटणीस यांची समाधी आहे. ग्रामस्थ वर्षानुवर्षे त्याची देखभाल करत आहेत. या ठिकाणी पौर्णिमेला दीप लावले जातात. समाधीस्थळाच्या विकासासाठी पाठपुरावा सुरू आहे.- उत्तमराव देशमुख, सरपंच, आवंढेसुधागड परिसरामध्ये अनेक महापुरुषांच्या समाधी आहेत. यामधील आवंढेमध्ये बाळाजी आवजी चिटणीस यांचीही समाधी आहे. नागरिकांनी इतिहासाच्या खुणा जपून ठेवल्या आहेत.- जयसिंग गोळे, माजी मुख्याध्यापक, शारदा विद्यालय, पेडली

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई