शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

By admin | Updated: September 3, 2015 03:05 IST

शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईशहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घनकचरा व मलनि:सारण विभागावर तब्बल ३४८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोडो रुपये खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालय व मुंबईला जावे लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. तुर्भे व नेरूळमधील माताबाल रुग्णालय बंद करण्यात आले आहे. कोपरखैरणे व ऐरोली माताबाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देता यावी यासाठी पालिकेने २००९ मध्ये ऐरोली, नेरूळ व बेलापूरमध्ये ८३ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून तीन नवीन रुग्णालये बांधण्याचे काम सुरू केले होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे हा खर्च १७० कोटी ६४ लाख रुपयांवर पोहचला आहे. रुग्णांसाठी फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे डॉक्टर रुग्णांना खाजगी रुग्णालय किंवा मुंबईला जाण्यास भाग पाडत आहेत. शहरात डेंग्यू, मलेरियाची प्रचंड साथ सुरू आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नगरसेवकांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. अशा स्थितीमध्ये महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. मागील तीन वर्षांमध्ये आरोग्य सुविधेवर तब्बल २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाच वर्षांत औषध खरेदीवर ११ कोटी खर्च झाला असून रुग्णवाहिकेसाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करूनही शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. महापालिकेने थेट वैद्यकीय सुविधेवर तीन वर्षामध्ये २०० कोटी खर्च केले असून आरोग्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा विभागावर मात्र याच कालावधीमध्ये २३० कोटी ९५ लाख व मलनि:सारण विभागावर ११७ कोटी २९ लाख रुपये खर्च केले आहेत. वैद्यकीय खर्चापेक्षा हा खर्च दीडपट जास्त आहे. मलनि:सारण विभागावर प्रचंड खर्च करूनही अद्याप ७० टक्के झोपडपट्टीवासीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. कोपरखैरणे, नेरूळ पूर्व व पश्चिम, सीवूड या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयच नाही. ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडवरही प्रसाधनगृह उभारण्यात आलेले नाही. कचरा उचलणे व वाहतुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा उचलल्यानंतर तिथे कीटकनाशक पावडर टाकली जात नाही. साफसफाई ठेकेदारही या पावडरचा वापर करत नाहीत. शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी धुरीकरण व औषध फवारणी योग्यप्रकारे होत नसून या सर्वांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.