शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

By admin | Updated: September 3, 2015 03:05 IST

शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईशहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घनकचरा व मलनि:सारण विभागावर तब्बल ३४८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोडो रुपये खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालय व मुंबईला जावे लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. तुर्भे व नेरूळमधील माताबाल रुग्णालय बंद करण्यात आले आहे. कोपरखैरणे व ऐरोली माताबाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देता यावी यासाठी पालिकेने २००९ मध्ये ऐरोली, नेरूळ व बेलापूरमध्ये ८३ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून तीन नवीन रुग्णालये बांधण्याचे काम सुरू केले होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे हा खर्च १७० कोटी ६४ लाख रुपयांवर पोहचला आहे. रुग्णांसाठी फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे डॉक्टर रुग्णांना खाजगी रुग्णालय किंवा मुंबईला जाण्यास भाग पाडत आहेत. शहरात डेंग्यू, मलेरियाची प्रचंड साथ सुरू आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नगरसेवकांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. अशा स्थितीमध्ये महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. मागील तीन वर्षांमध्ये आरोग्य सुविधेवर तब्बल २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाच वर्षांत औषध खरेदीवर ११ कोटी खर्च झाला असून रुग्णवाहिकेसाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करूनही शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. महापालिकेने थेट वैद्यकीय सुविधेवर तीन वर्षामध्ये २०० कोटी खर्च केले असून आरोग्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा विभागावर मात्र याच कालावधीमध्ये २३० कोटी ९५ लाख व मलनि:सारण विभागावर ११७ कोटी २९ लाख रुपये खर्च केले आहेत. वैद्यकीय खर्चापेक्षा हा खर्च दीडपट जास्त आहे. मलनि:सारण विभागावर प्रचंड खर्च करूनही अद्याप ७० टक्के झोपडपट्टीवासीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. कोपरखैरणे, नेरूळ पूर्व व पश्चिम, सीवूड या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयच नाही. ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडवरही प्रसाधनगृह उभारण्यात आलेले नाही. कचरा उचलणे व वाहतुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा उचलल्यानंतर तिथे कीटकनाशक पावडर टाकली जात नाही. साफसफाई ठेकेदारही या पावडरचा वापर करत नाहीत. शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी धुरीकरण व औषध फवारणी योग्यप्रकारे होत नसून या सर्वांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.