शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
2
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
3
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
4
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
5
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
6
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
7
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
8
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
9
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
10
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
11
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
12
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
13
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
14
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
15
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
16
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
17
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
18
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
19
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
20
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

आरोग्यापेक्षा कचऱ्यावर जास्त खर्च

By admin | Updated: September 3, 2015 03:05 IST

शहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

नामदेव मोरे, नवी मुंबईशहरवासीयांना चांगली आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात महापालिकेस अपयश आले आहे. तीन वर्षांमध्ये वैद्यकीय सेवांवर २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. घनकचरा व मलनि:सारण विभागावर तब्बल ३४८ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. करोडो रुपये खर्च करूनही शहरवासीयांना चांगल्या उपचारासाठी खासगी रुग्णालय व मुंबईला जावे लागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य सुविधा पूर्णपणे कोलमडली आहे. तुर्भे व नेरूळमधील माताबाल रुग्णालय बंद करण्यात आले आहे. कोपरखैरणे व ऐरोली माताबाल रुग्णालय फक्त नावापुरते सुरू आहे. शहरवासीयांना चांगली आरोग्य सुविधा देता यावी यासाठी पालिकेने २००९ मध्ये ऐरोली, नेरूळ व बेलापूरमध्ये ८३ कोटी ४६ लाख रुपये खर्च करून तीन नवीन रुग्णालये बांधण्याचे काम सुरू केले होते. परंतु वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे हा खर्च १७० कोटी ६४ लाख रुपयांवर पोहचला आहे. रुग्णांसाठी फक्त वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयाचाच पर्याय शिल्लक राहिला आहे. त्या ठिकाणी जागा नसल्यामुळे डॉक्टर रुग्णांना खाजगी रुग्णालय किंवा मुंबईला जाण्यास भाग पाडत आहेत. शहरात डेंग्यू, मलेरियाची प्रचंड साथ सुरू आहे. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नगरसेवकांच्या मुलालाही डेंग्यू झाला होता. अशा स्थितीमध्ये महापालिका प्रशासन हतबल झाले आहे. मागील तीन वर्षांमध्ये आरोग्य सुविधेवर तब्बल २०० कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. पाच वर्षांत औषध खरेदीवर ११ कोटी खर्च झाला असून रुग्णवाहिकेसाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. एवढा प्रचंड खर्च करूनही शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत. महापालिकेने थेट वैद्यकीय सुविधेवर तीन वर्षामध्ये २०० कोटी खर्च केले असून आरोग्याशी संबंधित असणाऱ्या घनकचरा विभागावर मात्र याच कालावधीमध्ये २३० कोटी ९५ लाख व मलनि:सारण विभागावर ११७ कोटी २९ लाख रुपये खर्च केले आहेत. वैद्यकीय खर्चापेक्षा हा खर्च दीडपट जास्त आहे. मलनि:सारण विभागावर प्रचंड खर्च करूनही अद्याप ७० टक्के झोपडपट्टीवासीयांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. कोपरखैरणे, नेरूळ पूर्व व पश्चिम, सीवूड या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालयच नाही. ठाणे बेलापूर रोड, पामबीच रोडवरही प्रसाधनगृह उभारण्यात आलेले नाही. कचरा उचलणे व वाहतुकीचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. कचरा उचलल्यानंतर तिथे कीटकनाशक पावडर टाकली जात नाही. साफसफाई ठेकेदारही या पावडरचा वापर करत नाहीत. शहरात डासांचा उपद्रव रोखण्यासाठी धुरीकरण व औषध फवारणी योग्यप्रकारे होत नसून या सर्वांमुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.