शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

नवी मुंबईत पावसाचा जोर कायम, ठिकठिकाणी साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 01:04 IST

नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती.

नवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात लॉकडाऊन असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. तरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना मात्र घडत आहेत. यामुळे मान्सूनपूर्व कामांचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, ऐरोलीत झाड कोसळून एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती. ३ जुलैपासून शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोली सर्वच विभागांत जोरदार पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसांत शहरात एकूण ४९३.६0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या, तसेच झाडे कोसळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बेलापूरमधील कोकणभवन इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, तसेच शिरवणे भुयारी मार्ग, ज्वेल आॅफ नवी मुंबई, तसेच शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे करताना पावसाळी नाल्यांची सफाई झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, तसेच धोकादायक झाडांची छाटणीसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग वादळात शहराच्या विविध भागांत शेकडो झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. मंगळवारी वाशीत एका वाहनावर झाड कोसळले.पनवेलमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारापनवेल : मागील दोन दिवसांपासून पनवेल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पनवेलमधील गाढी, तसेच कासाडी यांच्यासह उपनद्या ओसंडून वाहत असल्याने, तहसीलदारांनी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने माथेरानच्या डोंगरांतून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत आहे.तालुक्यातील जवळजवळ ४0 ते ५0 नदीकाठच्या गावांना अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, गावात पाणी शिरल्याचा धोका असल्याने तहसीलदार अमित सानप यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे, तसेच नदीपात्रात न उतरणे, जनावरांना नदीपात्रात न सोडण्याच्या खबरदारी ग्रामस्थांनी घेण्याचे अवाहन सानप यांनी केले.

 

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई