शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

नवी मुंबईत पावसाचा जोर कायम, ठिकठिकाणी साचले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 01:04 IST

नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती.

नवी मुंबई : शहरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शहरात लॉकडाऊन असल्याने वाहतूक आणि जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. तरी शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना मात्र घडत आहेत. यामुळे मान्सूनपूर्व कामांचा पुरता फज्जा उडाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दरम्यान, ऐरोलीत झाड कोसळून एका व्यक्तिचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे.नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात ४ जुलैपासून १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा या वर्षी शहरातील मान्सूनपूर्व कामांना उशिराने सुरुवात करण्यात आली होती. ३ जुलैपासून शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, दिघा, ऐरोली सर्वच विभागांत जोरदार पाऊस पडत आहे. मागील पाच दिवसांत शहरात एकूण ४९३.६0 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शहरातील विविध भागांत पाणी साचण्याच्या, तसेच झाडे कोसळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. मंगळवारी झालेल्या पावसामुळे बेलापूरमधील कोकणभवन इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते, तसेच शिरवणे भुयारी मार्ग, ज्वेल आॅफ नवी मुंबई, तसेच शहराच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. मे महिन्यात मान्सूनपूर्व कामे करताना पावसाळी नाल्यांची सफाई झाली नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत, तसेच धोकादायक झाडांची छाटणीसुद्धा करण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या महिन्यात आलेल्या निसर्ग वादळात शहराच्या विविध भागांत शेकडो झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या. मंगळवारी वाशीत एका वाहनावर झाड कोसळले.पनवेलमधील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारापनवेल : मागील दोन दिवसांपासून पनवेल तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पनवेलमधील गाढी, तसेच कासाडी यांच्यासह उपनद्या ओसंडून वाहत असल्याने, तहसीलदारांनी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याने माथेरानच्या डोंगरांतून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत आहे.तालुक्यातील जवळजवळ ४0 ते ५0 नदीकाठच्या गावांना अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे, गावात पाणी शिरल्याचा धोका असल्याने तहसीलदार अमित सानप यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे, तसेच नदीपात्रात न उतरणे, जनावरांना नदीपात्रात न सोडण्याच्या खबरदारी ग्रामस्थांनी घेण्याचे अवाहन सानप यांनी केले.

 

टॅग्स :RainपाऊसNavi Mumbaiनवी मुंबई