शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

वातावरणातील बदलामुळे ‘ताप’

By admin | Updated: March 21, 2017 02:15 IST

वातावरणात झालेला बदल व डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात तापाचा जोर वाढला आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी वाजत असल्यामुळे

नवी मुंबई : वातावरणात झालेला बदल व डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात तापाचा जोर वाढला आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी वाजत असल्यामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे दवाखान्याबाहेरच्या रांगा वाढल्या आहेत.राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात बदल झाला असून नवी मुंबईतही तो जाणवत आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे कामानिमित्ताने घराबाहेर निघणाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी थंडीची लाट सुटत असल्यामुळे नागरिकांना एकाच दिवसामध्ये दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. परंतु त्याचा परिणाम प्रकृतीवर होत असल्यामुळे अनेक जण सर्दी, तापाने ग्रासले आहेत. त्यापैकी अनेकांना घशाचे देखील त्रास जाणवत आहेत. अशातच शहरातल्या अनेक विभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये खाडीलगतच्या भागांचा अधिक समावेश आहे. खारफुटीमध्ये वाढलेले हे डास संध्याकाळच्या वेळी लोकवस्तीमध्ये घुसत असल्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. सर्दी-तापाने ग्रासलेला प्रत्येक जण रुग्णालयात जावून आपल्याला मलेरिया तर नाही झाला ना? याची खात्री करून घेत आहेत. यामुळे रुग्णालयांबाहेरच्या रांगा वाढत चालल्या असून त्यात पालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर धुरीकरण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषत्वाने उद्यानालगतच्या रहिवासी भागात संध्याकाळच्या वेळी मच्छरांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या रहिवाशांकडून धुरीकरणाची मागणी होत आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ व लगतच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे. उघडी गटारे ही देखील त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. परंतु धुरीकरणाची मागणी करूनही पालिकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी संपत घोलप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)