शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

वातावरणातील बदलामुळे ‘ताप’

By admin | Updated: March 21, 2017 02:15 IST

वातावरणात झालेला बदल व डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात तापाचा जोर वाढला आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी वाजत असल्यामुळे

नवी मुंबई : वातावरणात झालेला बदल व डासांचा प्रादुर्भाव यामुळे शहरात तापाचा जोर वाढला आहे. दुपारी कडक ऊन तर रात्री थंडी वाजत असल्यामुळे अनेकांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. यामुळे दवाखान्याबाहेरच्या रांगा वाढल्या आहेत.राज्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसानंतर वातावरणात बदल झाला असून नवी मुंबईतही तो जाणवत आहे. दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळे कामानिमित्ताने घराबाहेर निघणाऱ्यांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र रात्रीच्या वेळी थंडीची लाट सुटत असल्यामुळे नागरिकांना एकाच दिवसामध्ये दोन ऋतू अनुभवायला मिळत आहेत. परंतु त्याचा परिणाम प्रकृतीवर होत असल्यामुळे अनेक जण सर्दी, तापाने ग्रासले आहेत. त्यापैकी अनेकांना घशाचे देखील त्रास जाणवत आहेत. अशातच शहरातल्या अनेक विभागांमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामध्ये खाडीलगतच्या भागांचा अधिक समावेश आहे. खारफुटीमध्ये वाढलेले हे डास संध्याकाळच्या वेळी लोकवस्तीमध्ये घुसत असल्यामुळे डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे. सर्दी-तापाने ग्रासलेला प्रत्येक जण रुग्णालयात जावून आपल्याला मलेरिया तर नाही झाला ना? याची खात्री करून घेत आहेत. यामुळे रुग्णालयांबाहेरच्या रांगा वाढत चालल्या असून त्यात पालिकेच्या रुग्णालयांचाही समावेश आहे.डासांचा प्रादुर्भाव वाढत असताना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून वेळेवर धुरीकरण होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. विशेषत्वाने उद्यानालगतच्या रहिवासी भागात संध्याकाळच्या वेळी मच्छरांचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या रहिवाशांकडून धुरीकरणाची मागणी होत आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ व लगतच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात ही समस्या भेडसावत आहे. उघडी गटारे ही देखील त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. परंतु धुरीकरणाची मागणी करूनही पालिकेचे कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार स्थानिक रहिवासी संपत घोलप यांनी केली आहे. (प्रतिनिधी)