शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनदीमुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 23, 2015 01:55 IST

उल्हासनगर येथील खेमाणी नाला आणि म्हारळ येथील डम्पिंग ग्राउंडचे दूषित पाणी म्हारळदरम्यान उल्हासनदीत मिसळत आहे.

म्हारळ : उल्हासनगर येथील खेमाणी नाला आणि म्हारळ येथील डम्पिंग ग्राउंडचे दूषित पाणी म्हारळदरम्यान उल्हासनदीत मिसळत आहे. त्यामुळे या नदीपात्रातून पाणीपुरवठा होत असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी व मीरा भार्इंदर या महानगरपालिकांतील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय पर्यावरणाचा ऱ्हास होऊन नदीपात्रातील जलचर संपत्तीवरही परिणाम होत आहे.उल्हासनदी बदलापूर मार्गे कल्याणच्या दिशेला वाहते. तिच्यामुळे कांबा, म्हारळ आणि मोहने परिसरातून स्टेम प्राधिकरण ठाणे, भिवंडी तसेच मीरा भार्इंदर या महानगरपालिकांना पाणीपुरवठा होतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ते पाणी उल्हासनगर, म्हारळ आणि वरप यांना पुरवते. शिवाय एम.जे.पी. कल्याण आणि सेंच्युरी रेयॉन स्वतंत्रपणे पाणी उचलतात. जवळपास १४०४ एमएलडी प्रति दिन पाणी उल्हासनदीतून उचलले जाते. (सध्या ३० टक्के पाणीकपात आहे) मात्र या सर्वांच्या उदंचन केंद्राजवळच उल्हासनगरच्या खेमाणी नाल्याचे तसेच डम्पिंगचे दूषित पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न करता थेट उल्हासनदीच्या नदीपात्रात मिसळत आहे. त्यामध्ये कचरा, मृत जनावरांचे अवशेष, मानवी मैला असे शरीरास घातक विषारी घटक येत आहेत. यांचा परिणाम नदी पात्रात होऊन शेवाळ आणि जलवनस्पतीचे प्रमाणही खूप वाढते आहे. परिणामी, नदीतील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होऊन पात्रातील माशांनाही धोका निर्माण झाला आहे.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थानेही याआधी एमआयडीसीच्या अंतिम अहवालामध्ये खेमाणी नाला वळवणे तसेच लहान उद्योगधंद्यातील दूषित पाण्यावर (सीइपीटी) शुद्धीकरण प्रक्रिया करूनच ते पाणी पात्रात सोडण्याचे नमूद केले आहे. (वार्ताहर)उच्च न्यायालयाने गठीत केलेली कमिटी याबाबत निर्णय घेत आहे. मात्र उल्हासनगर महानगरपालिकेने जास्त वेळ घालवू नये.- हेमंत कुलकर्णी, उपअभियंता, लघू पाटबंधारे विभाग, कळवाआम्ही नदीपात्रातून १३० एमएलडी पाणी उचलत असून, ते उल्हासनगर, म्हारळ आणि कांबा यांना पुरवत आहोत.- एस.पी. सुरडकर, उपअभियंता, एमआयडीसी, कल्याणयाविषयी उच्च न्यायालयाने सक्त आदेश उल्हासनगर पालिकेस दिले आहेत. आदेशाचे पालन पालिकेने करावे.- डॉ. जी.बी. संगेवार, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळयेत्या ७ ते ८ दिवसांत काम सुरू करू. उच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत.- मनोहर हिरे, आयुक्त-उल्हासनगर महानगरपालिका