शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत प्रसिद्धीपासून दूर राहात कर्तव्यभावनेतून यांनी केली मदत; पैशांची अपेक्षा न करता, दिली अखंड सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 23:54 IST

पैशांची अपेक्षा न करता, दिली अखंड सेवा

नवी मुंबई : कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून ते एक वर्षानंतर दुसरी लाट सरु होईपर्यंत अनेक संस्था व व्यक्ती प्रसिद्धीपासून दूर राहात जनसेवा करत आहेत. रोडवरील नागरिकांना जेवण देण्यापासून ते रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यापर्यंत जी शक्य होईल ती मदत केली जात आहे. काही प्राण्यांवर मोफत उपचार करत आहेत, तर काही मृत्यू झालेल्या कोरोनाग्रस्तांवर विधीवत अंत्यसंस्कार करत आहेत. एक वर्षापेक्षा जास्त काळ अखंडपणे जनसेवा करणाऱ्यांमुळेच या आणीबाणीच्या स्थितीतून बाहेर येणे हजारो सर्वसामान्य नागरिकांना शक्य झाले आहे.

कोरोनाकाळात मुंबई, नवी मुंबईमधील ४ हजारपेक्षा जास्त पक्षी, प्राण्यांवर उपचार केले. एक वर्षापूर्वी कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यानंतर रोडवर कुत्री, भटकी जनावरे, गोशाळेतील गाई, जखमी पक्षी यांच्यावर वेळेत, योग्य व मोफत उपचार करण्यासाठी भूमी जीवदया संस्थेच्या रुग्णालयामार्फत आम्ही काम सुरू केले. प्रत्येक महिन्याला जवळपास १२५ कुत्र्यांवर उपचार केले जात आहेत. नवी मुंबई, खारघर, पनवेल परिसरातील गोशाळेतील गाईंवरही मोफत उपचार केले असून, वर्षभर प्रत्येक महिन्याला ३०० ते ४०० प्राणी, पक्ष्यांवर उपचार केले असून, हे काम अखंडपणे सुरू आहे.

मधुकर शिंदे - वर्षभरात दीड लाख नागरिकांना जेवण आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक वर्षांपासून नियमित अन्नदान करत आहोत. कोरोना सुरू झाल्यानंतर मनपा रुग्णालय, रोडवरील बेघर नागरिक व झोपडपट्टी परिसरात आम्ही अन्नछत्र सुरु केले. नियमितपणे अन्नदान करत असून, वर्षभरात दीड लाखपेक्षा जास्त नागरिकांना जेवण पुरविण्यात आले आहे. याशिवाय कोरोना रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिकेचा उपक्रमही राबविला.

बिपीन शहानंद - उपचार मिळवून दिले

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होेते. आम्ही नियमित रक्तदान शिबिरे घेऊन व इतर वैद्यकीय सुविधा देत असतो. कोरोनाकाळात रुग्णांना बेड उपलब्ध करुन देणे, औषधे मिळवून देणे, कोरोना चाचणी करण्यापासून ते रुग्णालयात दाखल करण्यापर्यंत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यास सुरुवात केली. वर्षभरात ६०० पेक्षा जास्त रुग्णांना सर्वांच्या सहकार्याने मदत उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय नियमित रक्तदान शिबिरांचेही आयोजन केले जात आहे.

सुनील वाघेला- अंत्यसंस्कारासाठी सहकार्य

महानगरपालिकेच्या रुग्णालयात आम्ही काम करतो. एक वर्षभरापूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर आम्हालाच अंत्यसंस्कार करावे लागायचे. नातेवाईक उपस्थित राहू शकत नव्हते. मृतदेह फक्त जाळण्यापेक्षा त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार करण्यास आम्ही प्रारंभ केला. आता नातेवाईक उपस्थित असतात. त्यांना धीर देऊन सुरक्षितपणे अंत्यदर्शन घेऊन देण्यासाठीही सहकार्य करतो. वर्षभरात आम्ही चार ते पाच जणांनी ६०० पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले असून, हे काम सुरुच आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई