शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
5
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
6
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
7
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
8
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
9
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
10
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
11
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
12
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
13
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
14
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
15
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
16
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
17
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
18
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
19
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
20
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद

हापूस बाजारात आला, दर 7 ते 12 हजार, वाशी मार्केटमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील आंबा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 13:19 IST

सोमवारी ५० पेट्या, मंगळवारी १०० पेट्या विक्रीसाठी आल्या. सध्या आंबा पेटीला ७ हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहे.

नवी मुंबई/रत्नागिरी : कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी उष्मा अशा नैसर्गिक संकटांवर मात करत झाडांना आलेला मोहर वाचवून तयार झालेला हापूस आता मुंबईच्याबाजारात दाखल झाला आहे. वाशी मार्केटमध्ये मंगळवारी कोकणातून हापूसच्या १०० पेट्या दाखल झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत ३२५ आंबा पेट्या आल्या असून, यातील ९५ टक्के देवगडमधील, तर पाच टक्के रत्नागिरी जिल्ह्यातील आहेत.

वाशी मार्केटमध्ये १ फेब्रुवारी रोजी १७५ आंबा पेट्या विक्रीला आल्या होत्या. रविवारी मार्केटला सुट्टी असल्याने विक्रीसाठी आंबा आला नाही.

त्यानंतर, सोमवारी ५० पेट्या, मंगळवारी १०० पेट्या विक्रीसाठी आल्या. सध्या आंबा पेटीला ७ हजार ते १२ हजार रुपये दर मिळत आहे. डिसेंबरमध्ये पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे आंबा झाडांना मोहर आला. मात्र, मोहराला निव्वळ फुलोरा राहिला आणि फळधारणाच झाली नाही.

मोहर काळा पडला

थंडी, उष्मा, ढगाळ हवामान एकूणच संमिश्र हवामानामुळे तुडतुडा, थ्रीप्स, कीडरोगांचा प्रादुर्भाव झाला. त्यातच अनेक ठिकाणी मोहर काळा पडला. काही मोहराच्या टोकाला एखाद दुसरे फळ होते. मात्र, तेही थंडीमुळे गळून गेले आहे.

अथक प्रयत्नानंतर बचावलेला आंबा तयार

ऑक्टोबरमध्ये आलेला मोहर व लगडलेली फळे वाचविण्यासाठी बागायतदारांना झाडावर ताडपत्रीही बांधावी लागली. बागायतदारांच्या अथक प्रयत्नानंतर बचावलेला आंबा आता तयार झाल्याने विक्रेत्यांनी फळ काढणी सुरू केली आहे. मात्र, हे प्रमाण किरकोळच असून, तयार झालेला आंबा वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झाला आहे.

वाशी मार्केटमध्ये दि. १ फेब्रुवारीपासून हापूस विक्रीसाठी येऊ लागला आहे. जानेवारीत एखाद दुसरीच पेटी आली होती. गेल्या तीन दिवसांत मार्केटमध्ये ३२५ पेट्या आल्या असल्या, तरी ९५ टक्के आंबा देवगड (सिंधुदुर्ग) तर अवघा ५ टक्के आंबा रत्नागिरीचा आहे. -संजय पानसरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी.

टॅग्स :Alphonso Mangoहापूस आंबाMarket Yardमार्केट यार्डMarketबाजारMumbaiमुंबई