शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

CoronaVirus News: कोरोना बळींचे अर्धशतक; प्रादुर्भाव वाढतच असल्याने नवी मुंबईकर चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:39 IST

एपीएमसीत २७ वर्षीय व्यावसायिकाचाही मृत्यू

- नामदेव मोरेनवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. शनिवारी पहाटे एपीएमसीत २७ वर्षांच्या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या तरुण व्यावसायिकास कोरोनाची लागण झाली होती. कोपरखैरणेमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्या आजोबांचेही १२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दहा दिवसांत घरात दोघांचा मृत्यू झाल्याने एपीएमसीसह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर शहरातील कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण झाले.

महापालिका कार्यक्षेत्रात १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. वाशीमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या फिलिपाइन्समधील नागरिकाला लागण झाली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असताना २५ मार्चला त्याचे निधन झाले. शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत जागा अपुरी पडत असल्याने वारकरी भवन, वाशीतील समाजमंदिर व पनवेलमधील इंडिया बुल्सच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू केले आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ११०० बेडचे रुग्णालय तयार केले जात आहे. रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब व श्वसनाचे आजार आहेत त्यांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. ५० पेक्षा जास्त वय असणाºया नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही जास्त होते; परंतु आता कोणताही आजार नसणाºया २० ते ४० वयोगटातील तरुणांचाही बळी जात आहे. सीवूडमधील डॉक्टरचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. एपीएमसीमधील जवळपास पाच व्यापाऱ्यांचा व कामगारासह वाहतूकदाराचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वाशीमध्ये राहणाºया व्यापाºयावर वेळेत उपचार होऊ न शकल्याने मृत्यू झाला होता. नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेतली नाही तर मृत्यूचे तांडव सुरूच राहण्याचीही भीती आहे.

उपचाराअभावी इतर आजारांमुळेही बळी

च्कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून इतर आजारांमुळेही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. सानपाडामध्ये डायलिसिस वेळेत उपलब्ध न झाल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कोपरखैरणेमध्ये ज्येष्ठ नगरसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.च्शहरातील अनेक रुग्णालय बंद आहेत. हृदयविकार व इतर गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी कुठे घेऊन जायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णालय व्यवस्थापनांकडून असहकार्य सुरूच राहिले तर कोरोना व्यतिरिक्त आजारांनीही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

शवागृहात जागा अपुरी

एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी त्याची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. तोपर्यंत मृतदेह पालिकेच्या शवागृहात ठेवावा लागतो. शवागृहात जागा अपुरी पडत असून दाटीवाटीने मृतदेह ठेवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना निदर्शनास आली होती.

एपीएमसीमधील परिस्थिती गंभीर

नवी मुंबईमध्ये एपीएमसीमुळे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. मार्केटमधील व्यापारी, कामगार, वाहतूकदार, सुरक्षारक्षक व इतर घटकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामुळे तुर्भे, कोपरखैरणे, नेरुळ, वाशी, घणसोलीमध्येही प्रादुर्भाव वाढला आहे. कांदा-बटाटा व भाजी मार्केटमधील व्यापाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस