शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

उरण शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2023 19:01 IST

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत.

- मधुकर ठाकूर

उरण: उरण शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी आठवड्यातील तीन दिवस करण्यात आलेली कपात कमी करुन रविवारी पाणी पुरवठा करण्याचे आदेश रायगडाचे पालक मंत्री उदय सामंत एमआयडीसीला दिलं आहेत. उरण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणाची पाणीपातळी खालावली आहे.त्यामुळे उरण एमआयडीसीने ऐन उन्हाळ्यातच मागील दोन महिन्यांपासून आठवड्यातून तीन दिवस २४ तास पाणीपुरवठा बंद करून पाणी कपात केली आहे. यामुळे मात्र उरण शहराला पाणी टंचाईने ग्रासले आहे.

पाणी टंचाईमुळे त्रस्त झालेल्या शहरवासीयांकडून दिवसाआड पाण्यासाठी मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी एमआयडीसीला पत्र देऊन आठवड्यातील बंद करण्यात आलेल्या तीन दिवसांपैकी रविवारी एक दिवस पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी उरण एमआयडीसीला लेखी पत्राद्वारे केली होती. तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी एमआयडीसीचे उप अभियंता रविंद्र चौधरी यांची भेट घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी विनंतीही केली होती. मात्र त्यानंतरही एमआयडीसीकडून सकारात्मक मिळाला नाही. त्यामुळे उरण शहरातील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांना विनंती केली होती.बालदी यांच्या विनंतीवरून उदय यांनी  मंत्रालयात बैठक बोलाविली होती.

मंत्र्यांच्या दालनात शुक्रवारी (३) आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आमदार महेश बालदी, आमदार  प्रशांत ठाकूर , भाजपा तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजपा शहर अध्यक्ष कौशिक शाह, उरण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष  जयविंद्र कोळी, उरण नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल इंगळे, उरण नगरपालिकेचे अभियंता झुंबर माने आदी उपस्थितीत होते. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत रानसई धरणातून उरण शहराकरिता दर रविवारी पाणीपुरवठा सुरू ठेवणेबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला आदेश दिले  आहेत.त्यामुळे येत्या रविवार पासून दर रविवारी पाणीपुरवठा थोड्या फार प्रमाणात सुरळीत होण्यास मदत होईल असा विश्वास मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतNavi Mumbaiनवी मुंबई