शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

पावसाने बहरल्या रोपवाटिका

By admin | Updated: June 22, 2016 02:09 IST

वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित

पेण : वर्षा ऋतूचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाल्याची झलक दोन दिवस पडलेल्या मृगाच्या सरींमुळे दिसून आली. ज्या ठिकाणी भातपेरणी झाली तेथे पावसामुळे भाताच्या नर्सरी रोपांनी आपले अस्तित्व दाखवित बळीराजाला आनंदाची वार्ता दिली. यामुळे सगळीकडे भात रोपांचे हिरवे गालिचे पसरल्याचे दिसून येत आहेत. पेणच्या १३ लाख १०० हेक्टर लागवडी क्षेत्रावरील ५० टक्के रोपवाटिकांनी आपले अस्तित्व दाखवले आहे. पुढच्या नक्षत्रांच्या रेलचेलीने सबंध शिवारात हिरवा गालिचा पसरुन पीक डोलू लागणार आहे. रायगडमधील एक लाख बारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती लागवड होणार आहे. पेणच्या शिवारात सुपीक लालबुंद मातीत भाताची नर्सरी रोपे आता शेतकऱ्यांसह सर्वांनाच खुणावत आहेत. तब्बल २० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मृगाच्या अंतिम टप्प्यात मान्सून राज्यभरात दाखल झाला. हवामानशास्त्र विभागाचे सर्व अंदाज फोल ठरवत थाटात मान्सूनची एण्ट्री झाली. परंतु जीव टांगणीला लागलेला बळीराजा मात्र चिंतातुर होता. मृगाची पाऊसधारा कधी एकदा पडते या प्रतीक्षेची अखेर होऊन पाऊस मनसोक्त पडला. धरणी ओलीचिंब झाली, अंकुरलेले दाणे या पावसाने अलगद वर आले. यासाठी पौर्णिमेच्या उधाणभरतीची वाट पहावी लागली. गतवर्षी पाऊस न पडल्याने तप्त झालेल्या धरणीला सुध्दा चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करावी लागते. शेवटी सृजनसृष्टीच्या नवचैतन्याचे मधुर मिलनातून नवी पहाट व उन्नती होते. भाताचे अमाप कोठार असलेल्या रायगड जिल्ह्याच्या शिवारात पावसाच्या पाण्यावरची शेती आता टिकणार; शेतामध्ये भाताचे मातीपासून तयार केलेले वाफे त्यात हिरव्या तृणांकुरांनी जन्म घेतल्याने या गोंडस व मनमोहक हिरव्या पुंजवयानी आता वाटसरुंचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. पेणच्या मुंबई - गोवा महामार्गालगतची शेती व पेण - खोपोली राज्य मार्गालगतच्या शेतात या हिरव्या - हिरव्या गालिच्यांचे सुरेख रंग प्रत्येकाचे मन आकर्षित करते. थोड्या अवधीत या शेतामध्ये सुगीची रेलचेल दिसणार आहे, अन् खरीप हंगामातील श्रमिकांची महिनाभर लावणीची कामे चालणार आहे. (वार्ताहर)