शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

नवी मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी कायम, पक्षामध्ये दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य कार्यकारिणी व युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागला आहे. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला आहे.उपमहापौर निवडणुकीच्या दरम्यान नवी मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड व शहरातील पदाधिकाºयांच्या नियुक्त्यांनंतरही गटबाजी सुरूच आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर पदाधिकारी यांचा एक गट असून दुसरीकडे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत असे दोन गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. युवक काँगे्रसचे ठाणे लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून चलो घर- घर अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांकडून युवक काँग्रेसला डावलण्यात येत आहे. विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भगत यांनी केला. ठाणे लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस युवकांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजनांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावेळीकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळुंज, सिद्धार्थ अवधूत, मयूर जैसवाल आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँगे्रसमधील या गटबाजीचा आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन्ही गटांशी समन्वय साधण्याची कसरत करावी लागणार आहे.>नवी मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत, युवक अध्यक्षांना फोन केले असता कधीही फोन घेत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कधी विचारपूस करत नाहीत. कार्यक्र मांबाबत माहिती देत नाहीत व बोलावतही नाहीत.- अनिल कौशिक, अध्यक्ष,नवी मुंबई जिल्हाकाँगे्रस कमिटी>मुख्य कार्यकारिणीकडून युवकच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेतले जात नाही. वारंवार डावलले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.- निशांत भगत,अध्यक्ष, युवक काँगे्रस