शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नवी मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी कायम, पक्षामध्ये दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य कार्यकारिणी व युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागला आहे. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला आहे.उपमहापौर निवडणुकीच्या दरम्यान नवी मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड व शहरातील पदाधिकाºयांच्या नियुक्त्यांनंतरही गटबाजी सुरूच आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर पदाधिकारी यांचा एक गट असून दुसरीकडे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत असे दोन गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. युवक काँगे्रसचे ठाणे लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून चलो घर- घर अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांकडून युवक काँग्रेसला डावलण्यात येत आहे. विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भगत यांनी केला. ठाणे लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस युवकांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजनांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावेळीकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळुंज, सिद्धार्थ अवधूत, मयूर जैसवाल आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँगे्रसमधील या गटबाजीचा आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन्ही गटांशी समन्वय साधण्याची कसरत करावी लागणार आहे.>नवी मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत, युवक अध्यक्षांना फोन केले असता कधीही फोन घेत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कधी विचारपूस करत नाहीत. कार्यक्र मांबाबत माहिती देत नाहीत व बोलावतही नाहीत.- अनिल कौशिक, अध्यक्ष,नवी मुंबई जिल्हाकाँगे्रस कमिटी>मुख्य कार्यकारिणीकडून युवकच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेतले जात नाही. वारंवार डावलले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.- निशांत भगत,अध्यक्ष, युवक काँगे्रस