शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी कायम, पक्षामध्ये दोन गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 00:02 IST

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य कार्यकारिणी व युवक काँगे्रसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसू लागला आहे. दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला आहे.उपमहापौर निवडणुकीच्या दरम्यान नवी मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. यानंतर जिल्हा कार्यकारिणीची निवड व शहरातील पदाधिकाºयांच्या नियुक्त्यांनंतरही गटबाजी सुरूच आहे. जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक व इतर पदाधिकारी यांचा एक गट असून दुसरीकडे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत असे दोन गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्येही दोन्ही गटांकडून स्वतंत्रपणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरू आहे. युवक काँगे्रसचे ठाणे लोकसभा मतदार संघ कार्यक्षेत्राचे अध्यक्ष निशांत भगत यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेवून चलो घर- घर अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. शहरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यकारिणीच्या पदाधिकाºयांकडून युवक काँग्रेसला डावलण्यात येत आहे. विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप भगत यांनी केला. ठाणे लोकसभा मतदार संघातील आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस युवकांच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन काँग्रेसच्या योजनांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले. यावेळीकाँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळुंज, सिद्धार्थ अवधूत, मयूर जैसवाल आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँगे्रसमधील या गटबाजीचा आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोन्ही गटांशी समन्वय साधण्याची कसरत करावी लागणार आहे.>नवी मुंबई काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत, युवक अध्यक्षांना फोन केले असता कधीही फोन घेत नाहीत. निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात कधी विचारपूस करत नाहीत. कार्यक्र मांबाबत माहिती देत नाहीत व बोलावतही नाहीत.- अनिल कौशिक, अध्यक्ष,नवी मुंबई जिल्हाकाँगे्रस कमिटी>मुख्य कार्यकारिणीकडून युवकच्या पदाधिकाºयांना विश्वासात घेतले जात नाही. वारंवार डावलले जात असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.- निशांत भगत,अध्यक्ष, युवक काँगे्रस