शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 07:21 IST

मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत.

नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वच भाज्यांची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाज्यांपेक्षा मिरचीची आवक सर्वाधिक होत असून, भावही तेजीत आहेत. होलसेल मार्केटमध्ये मिरची ६५ ते ८० रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात आहे. राज्यातील इतर बाजारपेठांमध्येही दर वाढल्याने मिरची तिखट झाली आहे.

मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. आले, वाटाणा, फरसबी, टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. मिरचीची जूनमध्ये होलसेल मार्केटमध्ये २० ते ४४ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. आता दर ६५ ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत. गुरुवारी मुंबई बाजार समितीमध्ये इतर भाज्यांपेक्षा मिरचीची आवक सर्वांत जास्त १६५ टन झाली. परंतु, मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्यामुळे दर तेजीत आहेत. 

दोन आठवडे आवक कमीच राहणारबाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाला मुंबईत विक्रीसाठी येत आहे. दक्षिणेकडील राज्य, गुजरात व इतर राज्यांमध्येही उत्पादन कमी असल्यामुळे तेथील आवक बंद झाली आहे. पुढील दोन ते तीन आठवडे आवक कमीच राहील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई