शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

भाजी बाजारात मिरचीचा ठसका; सर्वाधिक १६५ टन आवक, भावही तेजीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 07:21 IST

मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत.

नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून सर्वच भाज्यांची आवक कमी झाली असून, बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाज्यांपेक्षा मिरचीची आवक सर्वाधिक होत असून, भावही तेजीत आहेत. होलसेल मार्केटमध्ये मिरची ६५ ते ८० रुपये किलो व किरकोळ मार्केटमध्ये १२० ते १४० रुपये किलो दराने विकली जात आहे. राज्यातील इतर बाजारपेठांमध्येही दर वाढल्याने मिरची तिखट झाली आहे.

मागणी व पुरवठा यामध्ये तफावत असल्यामुळे सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. आले, वाटाणा, फरसबी, टोमॅटोचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. मिरचीची जूनमध्ये होलसेल मार्केटमध्ये २० ते ४४ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत होती. आता दर ६५ ते ८० रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत. गुरुवारी मुंबई बाजार समितीमध्ये इतर भाज्यांपेक्षा मिरचीची आवक सर्वांत जास्त १६५ टन झाली. परंतु, मागणीच्या तुलनेत ही आवक कमी असल्यामुळे दर तेजीत आहेत. 

दोन आठवडे आवक कमीच राहणारबाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी सांगितले की, सद्य:स्थितीत पुणे, नाशिकसह राज्याच्या विविध भागांतून भाजीपाला मुंबईत विक्रीसाठी येत आहे. दक्षिणेकडील राज्य, गुजरात व इतर राज्यांमध्येही उत्पादन कमी असल्यामुळे तेथील आवक बंद झाली आहे. पुढील दोन ते तीन आठवडे आवक कमीच राहील, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.  

टॅग्स :MarketबाजारNavi Mumbaiनवी मुंबई