शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

दहीहंडीसाठी गोविंदा पथके सज्ज

By admin | Updated: September 5, 2015 23:19 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने मंडळांना रोडवर दहिहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे बहुतांश मंडळांनी मैदानामध्ये उत्सव साजरा करण्याची

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने मंडळांना रोडवर दहिहंडी साजरी करण्यास परवानगी नाकारली आहे. यामुळे बहुतांश मंडळांनी मैदानामध्ये उत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. मैदान उपलब्ध झाले नाही त्यांनी उत्सवच रद्द केला आहे. अनेकांनी दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली आहे. मुंबई, ठाणे प्रमाणे मागील काही वर्षांपासून नवी मुंबईमध्येही भव्य स्वरूपात दहिहंडी उत्सव साजरा केला जावू लागला आहे. बहुतांश राजकिय नेते व कार्यकर्ते दहिहंडीचे आयोजन करत असून १ लाखापासून ११ लाख रूपयांपर्यंत बक्षीसांचे वाटप करू लागले आहेत. लाखो रूपयांच्या बंक्षीसांमुळे अनेक नामवंत गोविंदा पथके याठिकाणी हंडी फोडण्यासाठी येवू लागले होते. परंतू यंदा सर्वोच्च न्यायालयाने रोडवर उत्सव साजरा करण्यास मनाई केली आहे. यामुळे आयत्यावेळी मंडळांना मैदानांचा शोध सुरू करावा लागला. कोपरखैरणेमधील वैभव नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह अनेक नेत्यांच्या मंडळांनी मैदानामध्ये भव्य स्वरूपात उत्सवाचे आयोजन केले आहे. नेरूळमधील जनकल्याण मित्र मंडळाने नवी मुंबईमध्ये दहिहंडी उत्सवास लोकप्रियता मिळवून दिली होती. नगरसेवक रविंद्र इथापे यांनी पहिल्यांदा बक्षीसांची रक्कम एक लाख पेक्षा जास्त देण्याची प्रथा सुरू केली. परंतू यंदा दहिहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील बड्या नेत्यांना मैदाने उपलब्ध झाली आहेत. परंतू सामान्य कार्यकर्त्यांना मैदाने मिळाली नसल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्यांदाच मैदानामध्ये उत्सव होत असल्यामुळे वाहतूकिची कोंडी होणार नाही. मैदानामध्ये गोविंदा पथकांनाही हंडी फोडण्यासाठी सुरक्षीत वाटत आहे. (प्रतिनिधी)पोलिसांचा कडक बंदोबस्त : गोविंदा उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी शहरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. मंडळांना विश्वासात घेवून सूचना दिल्या आहेत. गोविंदाच्या सुरक्षेसाठी पुरेशी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. उत्सव शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याची प्रतिक्रिया परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप व वाहतूक पोलिस उपआयुक्त अरविंद साळवी यांनी दिली आहे. तुर्भे इंदिरानगरमध्ये शिवसेनेच्यावतीने प्रत्येक वर्षी भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी राज्यात भिषण दुष्काळ असल्यामुळे उत्सव रद्द करण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रूपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक रामाशेठ वाघमारे व शाखाप्रमुख महेश कोठीवाले यांनी दिली. जनकल्याण मित्र मंडळानेही उत्सव रद्द केला आहे. दुष्काळग्रस्तांसाठी दिड लाख रूपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती नगरसेवक रविंद्र इथापे यांनी दिली. इतरही अनेक मंडळांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे. कार्यकर्त्यांची नाराजी शहरातील अनेक गोविंदा उत्सव मंडळांना मैदान उपलब्ध झाले नाही. यामुळे अनेकांना उत्सव रद्द करावा लागला. रोडवर परवानगी मागीतलेल्या मंडळांना पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे आयोजकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे मोठ्या नेत्यांच्या मंडळांना मैदाने मिळाली असून सामान्य कार्यकर्त्यांवर मात्र उत्सव रद्द करण्याची वेळ आली. यामध्ये शिवसेना, भाजपा पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. युतीची सत्ता असतानाच गोविंदा उत्सव साजरा करता न आल्यामुळे कार्यकर्त्यांनी खाजगीत नाराजी व्यक्त केली. युतीपेक्षा आघाडीसरकार परवडले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.