शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
3
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
4
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
5
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
6
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
7
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
8
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
9
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
10
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
11
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
12
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
13
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
14
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
15
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
16
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
17
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
18
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
19
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
20
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!

सरकारच्या बेफिकिरीचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2016 02:07 IST

सरकारी गोदामांची कमी संख्या आणि खासगी संस्थांच्या गोदामांचे न परवडणारे दर अशा दुहेरी कारणामुळे जिल्ह्यात भात खरेदी उशिरा सुरू झाली.

आविष्कार देसाई,  अलिबागसरकारी गोदामांची कमी संख्या आणि खासगी संस्थांच्या गोदामांचे न परवडणारे दर अशा दुहेरी कारणामुळे जिल्ह्यात भात खरेदी उशिरा सुरू झाली. परिणामी गेल्या वर्षीच्या तुलनेत भात खरेदीचे प्रमाण यंदा खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारच्या या बेफिकिरीचा थेट आर्थिक फटका जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख सात हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली होती. त्या माध्यमातून दोन हजार ८८४ प्रति हेक्टर भाताचे उत्पादन झाले. सरकारने यंदा सर्वसाधारण भाताला एक हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर जाहीर केला. यंदा भाताचे उत्पादन तीन लाख आठ हजार ५८० क्विंटल झाले आहे. सरकारने भाताला प्रतिक्विंटल एक हजार ४१० रुपये दर दिला असल्याने ४३ कोटी ५० लाख ९७ हजार ८०० रुपयांचा भात पणन विभाग खरेदी करू शकणार आहे.गेल्या वर्षी एक लाख १४ हजार हेक्टर क्षेत्रामधून दोन हजार ७९२ प्रतिक्विंटल भाताचे उत्पादन झाले होते. त्यावेळी एक हजार ३१० अधिक २०० रुपये बोनस असा दर दिला होता. ८४ हजार क्लिंटल भाताची खरेदी पणन विभागाने केली होती, ज्याची किंमत ४८ कोटींच्या घरात होती.यंदा भाताची खरेदी दोन महिने उशिरा सुरू झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी तो बाजारात विकला आहे. ज्या ठिकाणी भात खरेदी केंद्र नाही तेथील शेतकरीही सरकारने दिलेल्या दराला मुकणार आहेत. जिल्ह्यात सध्या कर्जत तालुक्यातील लाडीवली, कळंब येथेच भात खरेदी केंद्रे पणन विभागाने सुरू केली आहेत. कर्जतमध्ये आणखीन दोन, पाली तीन, पोलादपूर आणि पेण येथे प्रत्येकी एक केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पणन विभागाने सांगितले. सरकारी गोदामांची संख्या अपुरी आहे, त्याचप्रमाणे खासगी गोदामांचे दर परवडत नाही. त्यामुळे भात खरेदीला उशीर झाला ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. परंतु काही शेतकऱ्यांकडे भात असेल ते विकू शकतात तसेच पाली, रोहे, मुरुड आणि माणगाव या तालुक्यांतील शेतकरी उन्हाळी भातशेती करतात. त्यांना याचा लाभ घेता येईल. यंदा ४० हजार क्विंटल भाताची खरेदी होण्याची शक्यता आहे.- भारतभूषण पाटील, जिल्हा पणन अधिकारी, रायगड