शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

दादर वाचविणाऱ्या जवानाप्रति सरकारची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:26 IST

२८ वर्षे दखल नाही : १९९३च्या बॉम्बस्फोटात मोलाची कामगिरी

ठळक मुद्दे१२ मार्चला १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या दिवशी मुंबईत सलग १२ बॉम्बस्फोट झाले होते व त्यानंतरही अनेक दिवस संशयास्पद वस्तू आढळत होत्या.

सूर्यकांत वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात दादरचा बॉम्ब निकामी करणारे जवान अद्यापही केंद्र व राज्य सरकारपासून दुर्लक्षित आहेत. स्कूटरमध्ये ठेवलेला १२ किलो आरडीएक्सचा बॉम्ब निकामी करून त्यांनी दादरमधील शेकडो जीव वाचवले होते. मात्र त्यांच्या शिफारशीवरून सहा अधिकाऱ्यांना योग्य तो सन्मान देणाऱ्या सरकारने त्यांनाच उपेक्षित ठेवले आहे.१२ मार्चला १९९३ ला मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांनी संपूर्ण देश हादरला होता. या दिवशी मुंबईत सलग १२ बॉम्बस्फोट झाले होते व त्यानंतरही अनेक दिवस संशयास्पद वस्तू आढळत होत्या. याचदरम्यान १४ मार्चला दादर येथे उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये १२ किलो आरडीएक्स आढळून आले होते.

दहशतवाद्यांनी मुंबईत पेरलेल्या बॉम्बपैकी तो तेरावा बॉम्ब होता. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी मुंबई विमानतळाच्या बॉम्ब शोधक व निकामी पथकाला बोलावण्यात आले होते. यावेळी पथकाचे प्रमुख मेजर वसंत जाधव यांनी तीन तासांच्या प्रयत्नांनंतर हा बॉम्ब निकामी करून परिसरातल्या हजारो नागरिकांचे प्राण वाचवले होते. यावेळी नागरिकांनी अक्षरश: त्यांना खांद्यावर उचलून घेतले होते. या साखळी बॉम्बस्फोटातील पहिला बॉम्ब वरळी येथे आढळला होता. परंतु तो निकामी करण्यासाठी जाधव यांचे पथक जात असतानाच त्याचा भीषण स्फोट झाला. यात जाधव व त्यांचे सहकारी जखमी झाले असता काही क्षणातच मुंबईत इतर ठिकाणीदेखील बॉम्बचे धमाके झाले. यामुळे विमानतळाची सुरक्षा महत्त्वाची असल्याने ते पथकासह परत विमानतळाकडे येत होते. दरम्यान, गजबजलेल्या कोळीवाडा येथे रस्त्यावरच एक हॅन्ड ग्रॅनाईट फेकला असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावेळी त्यांनी क्षणाची विलंब न लावता तो हॅन्ड ग्रॅनाईट त्या ठिकाणावरून माहीम समुद्रकिनारी नेऊन निकामी केला. सैन्यातून निवृत्त होऊन विमानतळाच्या बॉम्बशोधक पथकाच्या प्रमुखपदाची जबाबदारी घेतलेल्या मेजर जाधव यांच्या या दोन्ही कामगिरीमुळे जीवितहानी टळली.

मेजर जाधव यांच्या शिफारशीवरून त्यांच्या सहा सहकाऱ्यांचा राज्य व केंद्र सरकारने योग्य तो सन्मान केला. त्यांना केंद्र व त्यांच्या राज्याने आजीवन पेन्शन सुरू केली आहे. मात्र जाधव यांची दखल ना केंद्र सरकारने, ना राज्य सरकारने घेतली. घटनेच्या २८ वर्षांनंतरदेखील ते राज्य व केंद्र सरकारकडून योग्य सन्मानाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्याने केले दुर्लक्ष

१२ मार्च १९९३ ला मुंबईत स्फोट होऊ लागले असता आमच्या पथकाने मुंबईच्या मदतीसाठी धाव घेतली होती. किमान तीन महिने ठिकठिकाणी आढळणाऱ्या बॉम्बसदृश वस्तू व बॉम्ब निकामी केले. परंतु सहा आठवडे आगोदरच सैन्यातून निवृत्त झालो असल्याने ना सैन्याने कार्याची दखल घेतली. तर केंद्राच्या सूचनेवरून राज्याच्या मदतीला धावूनही केंद्राने दखल घेतली नाही. तर पोलीस दलाचा घटक नसल्याने राज्याने दुर्लक्षित केले.    - मेजर वसंत जाधव (निवृत्त)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईSoldierसैनिक