शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

महिला सुरक्षेबाबत सरकार असंवेदनशील; चित्रा वाघ यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 01:49 IST

वाशीतील कोविड केअर सेंटरची केली पाहणी

नवी मुंबई : कोरोना संसर्गाच्या काळात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. मागील दहा दिवसांत राज्याच्या विविध जिल्ह्यांत अशा प्रकारचे अमानुष्य प्रकार घडले आहे. काही ठिकाणी विलगीकरण केंद्रात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित महिलांवरही अत्याचार करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांबाबत राज्य सरकारकडून कोणतेही कारवाई होताना दिसत नाही. यातून महिलांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार किती संवेदनशील आहे, हे दिसून येते, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाºया कोरोनाबाधित महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमधील कोविड केअर सेंटरमध्ये महिला रुग्णांसाठी असलेल्या सोईसुविधा व उपचार पद्धतीचा चित्रा वाघ यांनी सोमवारी आढावा घेतला. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. कोरोनाच्या अगोदर आणि आता कोरोनामध्ये महिलांवरील अत्याचार सुरूच आहेत.महिलांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने दिशा कायदा आणण्याचे आश्वासन फेब्रुवारी महिन्यात दिले होते. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. मुळात सरकार कोणाचेही असो, महिलांच्या सुरक्षेबाबत तडजोड करता कामा नये, असे स्पष्ट करून महिला सुरक्षिततेच्या प्रश्नांवर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन यावेळी चित्रा वाघ यांनी केले आहे. कोविड केंद्रात उपचार घेणाºया कोरोनाग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली असायला हवी असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी खासदार संजीव नाईक, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, तसेच महापालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.अत्याचार करणाºयास कठोर शिक्षा व्हावीकोविड केंद्रात उपचार घेणाºया कोरोनाग्रस्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस नियमावली असायला हवी. कोरोनाग्रस्त महिलेवर अत्याचार करणाºयाला कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याचबरोबर, संबंधित उपचार घेत असलेल्या कोविड सेंटरच्या प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी. कारण कोरोनाविरुध्दची लढाई कधी संपेल, हे सांगता येत नाही, परंतु महिलांवर अत्याचार करणारी प्रवृत्ती संपायला हवी, असे मत चित्रा वाघ यांनी व्यक्तकेले आहे.