शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

प्रस्तावित तालुक्यांसाठी गूड न्यूज; कोकण आयुक्तांची समिती देणार सहा महिन्यांत अहवाल

By नारायण जाधव | Updated: March 7, 2023 16:56 IST

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने त्यांच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे.

नवी मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने त्यांच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे. सध्या तालुक्यांचे विभाजन करण्यासाठी १९७५ साली स्थापन केलेल्या कपूर समितीने ठरविलेले १०० निकष तलाठी साज्जासाठी विचारात घेतले जातात. परंतु, या घटनेला आज ४८ वर्षे उलटली आहेत. कालौघात महसूल विभागात विविध सेवांचे संगणकीकरण झालेले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानात बदल झालेले आहेत, यामुळे नवीन तलाठी, सज्जे, मंडल कार्यालयासंह नवीन तालुकानिर्मितीसाठी कोणते निकष असावेत, हे ठरविण्यासाठी राज्य सरकारने नवी मुंबईतील कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्तांची नवी समिती स्थापन केली आहे.

या समितीस पाच निकषांवर काम करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. १०० गुणांच्या सूत्रावर आधारित हे निकष असतील. त्यावर अभ्यास करून प्रसंगी गरज भासल्यास नवनिर्मित तालुक्यांसह प्रस्तावित तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन १८० दिवसांत या समितीने अहवाल सादर करायचा आहे. यासाठी शासनाने समितीस पाच निकषांची पंचसूत्री दिली आहे. याबाबतचा संपूर्ण खर्च कोकण आयुक्तांनी करायचा आहे.

पंचसूत्रीत कोणते आहेत ते पाच निकष?

१-नवनिर्मित तालुक्यात समाविष्ट करायची गावे, त्यांची लोकसंख्या तसेच खातेदार, जमीन महसूल, तालुकांतर्गत येणारे क्षेत्र.२ -नवनिर्मित तालुक्याकरिता मुख्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसुविधा तसेच मुख्यालयाचे भौगोलिक, नैसर्गिक व ऐतिहासिक स्वरूप व नवीन तालुकानिर्मितीबाबत सामान्य जनतेचा कल.

३ - नव्याने निर्माण करावयाच्या तालुक्यामध्ये विविध सेवांचे झालेले संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानात झालेला बदल आणि ऑनलाइन सेवासुविधा या संबंधीच्या बाबी विचारात घेण्यात याव्यात.

४ - याशिवाय राज्यातील काही तालुक्यांत नजीकच्या कालावधीत निर्माण करण्यात आलेली वा प्रस्तावित अपर तहसील कार्यालये, तसेच नवीन तलाठी सज्जे, मंडल कार्यालये निर्माण करण्यास शासनाने दिलेल्या मान्यता विचारात घेण्यात याव्यात.

५- नवीन तालुका सर्व सोयीसुविधांसह कार्यान्वित करण्यासाठी अंदाजे किती वार्षिक आवर्ती व अनार्वती खर्च.(निर्माण करावयाच्या पदांच्या तपशिलासह) अपेक्षित असून ते विचारात घेण्यास समितीस सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई