शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

प्रस्तावित तालुक्यांसाठी गूड न्यूज; कोकण आयुक्तांची समिती देणार सहा महिन्यांत अहवाल

By नारायण जाधव | Updated: March 7, 2023 16:56 IST

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने त्यांच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे.

नवी मुंबई : राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतील काही तालुक्यांच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने त्यांच्या विभाजनाची मागणी जोर धरत आहे. सध्या तालुक्यांचे विभाजन करण्यासाठी १९७५ साली स्थापन केलेल्या कपूर समितीने ठरविलेले १०० निकष तलाठी साज्जासाठी विचारात घेतले जातात. परंतु, या घटनेला आज ४८ वर्षे उलटली आहेत. कालौघात महसूल विभागात विविध सेवांचे संगणकीकरण झालेले आहे. तसेच माहिती तंत्रज्ञानात बदल झालेले आहेत, यामुळे नवीन तलाठी, सज्जे, मंडल कार्यालयासंह नवीन तालुकानिर्मितीसाठी कोणते निकष असावेत, हे ठरविण्यासाठी राज्य सरकारने नवी मुंबईतील कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागीय आयुक्तांची नवी समिती स्थापन केली आहे.

या समितीस पाच निकषांवर काम करून सहा महिन्यांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. १०० गुणांच्या सूत्रावर आधारित हे निकष असतील. त्यावर अभ्यास करून प्रसंगी गरज भासल्यास नवनिर्मित तालुक्यांसह प्रस्तावित तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन १८० दिवसांत या समितीने अहवाल सादर करायचा आहे. यासाठी शासनाने समितीस पाच निकषांची पंचसूत्री दिली आहे. याबाबतचा संपूर्ण खर्च कोकण आयुक्तांनी करायचा आहे.

पंचसूत्रीत कोणते आहेत ते पाच निकष?

१-नवनिर्मित तालुक्यात समाविष्ट करायची गावे, त्यांची लोकसंख्या तसेच खातेदार, जमीन महसूल, तालुकांतर्गत येणारे क्षेत्र.२ -नवनिर्मित तालुक्याकरिता मुख्यालयाच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या साधनसुविधा तसेच मुख्यालयाचे भौगोलिक, नैसर्गिक व ऐतिहासिक स्वरूप व नवीन तालुकानिर्मितीबाबत सामान्य जनतेचा कल.

३ - नव्याने निर्माण करावयाच्या तालुक्यामध्ये विविध सेवांचे झालेले संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञानात झालेला बदल आणि ऑनलाइन सेवासुविधा या संबंधीच्या बाबी विचारात घेण्यात याव्यात.

४ - याशिवाय राज्यातील काही तालुक्यांत नजीकच्या कालावधीत निर्माण करण्यात आलेली वा प्रस्तावित अपर तहसील कार्यालये, तसेच नवीन तलाठी सज्जे, मंडल कार्यालये निर्माण करण्यास शासनाने दिलेल्या मान्यता विचारात घेण्यात याव्यात.

५- नवीन तालुका सर्व सोयीसुविधांसह कार्यान्वित करण्यासाठी अंदाजे किती वार्षिक आवर्ती व अनार्वती खर्च.(निर्माण करावयाच्या पदांच्या तपशिलासह) अपेक्षित असून ते विचारात घेण्यास समितीस सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई