शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सोनेरी दिवस आले अन् हळद हसली! बाजारभाव तेजीत, शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

By नामदेव मोरे | Updated: March 4, 2024 07:19 IST

मिरची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते; परंतु हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले.

नवी मुंबई : या वर्षी देशभर हळदीला चांगला भाव मिळू लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई बाजार समितीमध्येही हळद १५० ते २०० रुपये किलो दराने विकली जात असून, यामध्ये अजून वृद्धी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मिरची, जिरे, वेलचीसह बहुतांश सर्व मसाल्याच्या पदार्थांचे दर मागील वर्षी तेजीत होते. काही वस्तूंचे दर पाच पट वाढले होते; परंतु हळदीला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले.

गतवर्षी मुंबई बाजार समितीमध्ये हळद प्रतिकिलो ९० ते १३० रुपये किलो दराने विकली जात होती. यावर्षी हेच दर १५० ते २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे. बाजार समितीमध्ये प्रतिदिन ३० ते ५० टन हळदीची विक्री होत आहे. 

औषधी गुणधर्महळदीमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे ग्राहकांकडून आहारामध्येही हळदीला नेहमी प्राधान्य दिले जाते. औषध, सौंदर्य प्रसाधनामध्ये, धार्मिक कार्यक्रम व लग्नकार्यातही हळदीचा वापर होत असतो.

९० ते १३० रुपये किलो दर गतवर्षी १५० ते २०० रुपये किलो दर यावर्षी 

गतवर्षी हळदीचे दर कमी होते. यावर्षी हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. - अमरीश बरोत, व्यापारी मसाला मार्केट 

यासाठी हळकुंडांना मागणीउन्हाळ्यामध्ये लग्नसराई, चटणी तयार करणे यासाठी हळद व हळकुंडांना मागणी वाढते. यामुळे पुढील दोन महिने हळदीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला  जात आहे. मुंबई बाहेरील बाजारपेठांमध्येही हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तामिळनाडूसह महाराष्ट्र आघाडीवरदेशात तामिळनाडू व महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधिक उत्पादन होते. तेलंगणा, कर्नाटकमध्येही मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाते. महाराष्ट्रात सातारा, सांगली, हिंगोली परिसरात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.

सर्वाधिक उत्पादन भारतातजगातील सर्वांत जास्त हळदीचे उत्पादन भारतामध्ये होते. २०२२-२३ मध्ये ३.२४ लाख हेक्टरवर हळद लागवड केली होती. ११.६१ लाख टन हळदीचे उत्पादन झाले होते. जगातील उत्पादनापैकी ७५ ते ८० टक्के उत्पादन फक्त भारतामध्ये  होते. युएई, युएसए, मलेशिया, बांगलादेश व इतर देशात निर्यात केली जाते.  देशात ३० पेक्षा जास्त जातीच्या हळदीची लागवड केली जाते. 

टॅग्स :FarmerशेतकरीMarketबाजार