शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

विशेष मुलांना प्रवेश द्या

By admin | Updated: May 6, 2015 00:41 IST

वाशीमधील नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा-सुविधा केंद्राच्या वतीने शहरातील विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

प्राची सोनवणे, नवी मुंबईवाशीमधील नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण, सेवा-सुविधा केंद्राच्या वतीने शहरातील विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या केंद्रात प्रशिक्षण घेण्यासाठी हजारो मुले प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वच पालिका शाळा, तसेच खाजगी शाळांनी आपल्या शाळेत या मुलांना प्रवेश देऊन सहकार्य केले पाहिजे, असे आवाहन केंद्राच्या संचालिका वर्षा भगत यांनी केले आहे. ईटीसी केंद्रात सध्या ४७७ मुले प्रशिक्षण घेत आहेत. अपंग प्रवर्गातील १२०० हून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या प्रवेश मर्यादेच्या अधीन राहूनच केंद्रामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे सर्वच मुलांना प्रवेश देणे शक्य होत नाही. या केंद्रात बहुअपंगत्व आणि मतिमंद विभागातील मुलांची संख्या जास्त आहे. नवी मुंबई परिसरातील शाळांमध्ये किमान एका तरी विशेष मुलाला प्रवेश मिळावा यासाठी केंद्राच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. ईटीसी केंद्रात आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी प्रवेशासाठी पालकांची रांग लागते. आपल्या मुलाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच प्रत्येक पालकाची अपेक्षा असते. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे तसेच महापौर सागर नाईक यांनी या केंद्रासाठी वेळोवेळी सहकार्य केले आहे. विशेष मुलांना जवळपासच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी केंद्राच्या वतीने पालकांना तसेच शाळेला पुरेपूर सहकार्य केले जाते. शाळेतील शिक्षकांना यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची सोय या केंद्रामार्फत केली जाते. तसेच पालकांसाठीही विविध उपक्रम राबविले जातात. १ एप्रिल ते १५ जून या कालावधीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षणाची सोय केलेली आहे. या उपक्रमांतर्गत सध्या १२ मुले प्रशिक्षण घेत आहेत. पालक आणि मुलांना एकत्रितपणे प्रशिक्षण दिले जाते, जेणेकरून त्यानंतर घरच्या घरी देखील मुलांचा विकास होऊ शकतो. यामध्ये फिजियोथेरेपीचा समावेश असतो. तसेच वाचा, श्रवण, बौद्धिक क्षमता, शैक्षणिक पातळी, व्यवसाय उपयोगी प्रशिक्षण देऊन कमीत कमी कालावधीत मुलांचा जास्तीत जास्त विकास केला जातो. खाजगी संस्थांच्या वतीने अशा विशेष मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी एका सेशन्समागे २७५ ते ३०० रुपयांचा दर आकारला जातो. ईटीसी केंद्रात तज्ज्ञांच्या मदतीने मोफत प्रशिक्षण देण्यात येते.